vaccine 
देश

आतापर्यंत किती लशींचा देशात पुरवठा झाला? आरोग्य मंत्रालयाने दिलं उत्तर

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशभरात कोविड प्रतिबंधक लसीची ओरड सुरू असताना देशात आतापर्यंत दहा कोटी लसीचे डोस वितरित करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. गेल्या २४ तासांत ३५ लाख डोस देण्यात आले असून, लस पुरवठ्यात इतर देशांच्या तुलनेत भारत अग्रक्रमावर असल्याचा दावा या मंत्रालयाने केला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्र सरकार इतर देशांना लस निर्यात करीत असल्याने कॉंग्रेस, आम आदमी पार्टी त्यावर टीकेची झोड उठविली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने दहा कोटी लस वितरित झाल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. देशात नवे रुग्ण वाढत असून, गेल्या चोविस तासांत एक लाख ५२ हजार ८७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, तमीळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये कोरोनो रुग्णांची संख्या वाढतच आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ५५ हजार ४११, छत्तीसगड १४ हजार ९८ आणि उत्तर प्रदेशात १४ हजार ७४८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 

महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि केरळ या पाच राज्यांमध्ये देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येपैकी ७०.८२ टक्के सक्रीय रुग्ण आहेत. एकट्या महाराष्ट्रातील सक्रीय रुग्ण संख्या ही एकूण रुग्णांच्या ४८.५७ टक्के आहे. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही महाराष्ट्रात अधिक आहे, असे निरीक्षण आरोग्य मंत्रालयाने नोंदविले आहे. 

देशातील प्रत्येक नागरिकाचा लसीकरणाचा हक्क केंद्र सरकारने हिरावू नये. केंद्र राजनैतिक फायद्यासाठी अन्य देशांना लस निर्यात करीत आहे. यामुळे देशातील नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे प्रथम देशातील नागरिकांचे लसीकरण करावे. तसेच लसीकरणासाठी घातलेली वयाची मर्यादा रद्द करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने पंतप्रधांनाकडे केली आहे. या पक्षाचे आमदार राघव चढ्ढा यांनी यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT