heat sakal
देश

Hottest Year : 1901 नंतरचं पाचवं सर्वात गरम वर्ष 2021

वर्षभरात चक्रीवादळ, अतिवृष्टी सारख्या घटनांमुळे देशात 1,750 लोकांचा मृत्यू झाला आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : 2021 हे वर्ष 1901 नंतरचे भारतातील पाचवे सर्वात उष्ण वर्ष होते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शुक्रवारी दिली आहे. देशात सरासरी वार्षिक हवेचे तापमान 0.44 अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेल्याचेदेखील हवामान विभागाने म्हटले आहे. वर्षभरात पूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी, भूस्खलन, वीज पडणे यासारख्या घटनांमुळे देशात 1,750 लोकांचा मृत्यू झाला आहे. 1901 नंतर 2021 हे वर्ष 2016, 2009, 2017 आणि 2010 नंतरचे देशातील पाचवे सर्वात उष्ण वर्ष नोंदविण्यात आले आहे, असे हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. (IMD RELEASED THE ANNUAL CLIMATE STATEMENT)

हिवाळा (जानेवारी ते फेब्रुवारी) आणि पावसाळ्यानंतरचे (ऑक्टोबर ते डिसेंबर) संपूर्ण भारतातील सरासरी तापमानातील विसंगती अनुक्रमे 0.78 डिग्री सेल्सिअस आणि 0.42 डिग्री सेल्सिअसने 2021 मध्ये तापमानवाढीस हातभार लावल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 2016 मध्ये , देशातील सरासरी वार्षिक हवेचे तापमान सामान्यपेक्षा 0.710 अंश सेल्सिअस जास्त होते. ते 2009 आणि 2017 च्या सरासरी तापमानापेक्षा अनुक्रमे 0.550 °C आणि 0.541 °C जास्त होते. तर, 2010 मध्ये सरासरी वार्षिक हवेचे तापमान सामान्यपेक्षा 0.539 °C जास्त होते. (2021 Is Found To Be The 5Th Warmest Year)

भारतात 2021 मध्ये वादळ आणि वीज (Lightning) पडून 787 लोकांचा मृत्यू (Death) झाल्याची नोंद झाली आहे, तर अतिवृष्टी (Flood) आणि पुरामुळे 759 लोक मरण पावले आहेत, असे हवामान (IMD) खात्याच्या निवेदनात म्हटले आहे. चक्रवाती तूफानामुळे 172 जणांचा मृत्यू झाला असून हवामाना संबंधित इतर घटनांमुळे 32 अन्य लोकांचा मृत्यू झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या सगळ्यमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 350 मृत्यू नोंदविण्यात आले आहेत, त्यानंतर ओडिशामध्ये 223 आणि मध्य प्रदेश मध्ये 191 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे हवामानखात्याने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरलं! 'वैद्यकीय पदवी नसताना चालवला दवाखाना'; तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा, अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया

Pune News: शीव, पाणंद, रस्त्यांची गावदप्तरी नोंद होणार; जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे समितीची राज्य सरकारला शिफारस

'मी जेवणात उंदीर खाल्लाय' 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, 'हे ऐकून माझ्या....'

Ahilyanagar Crime:'सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले'; अकोले तालुक्यात उडली खळबळ

Latest Marathi News Live Updates : रायगडमध्ये तूफान पाऊस, रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT