नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंशाच्या वर पोहोचला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण आहेत. मात्र, आसाममध्ये पावसाने (Asam Rain) धुमाकूळ घातला आहे. नद्यांना पूर आला असून अनेक गावांमध्ये भूस्सखलन (Landslide) झाले आहे. यामध्ये ३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. दिमा हासाओ जिल्ह्यातील हाफलांग भागात शनिवारी भूस्सखलनाची घटना घडली. यामध्ये एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला. दिमा हासाओ जिल्ह्यातील १२ गावांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे. सुमारे 80 घरांचे नुकसान झाले आहे. याबाबत आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने माहिती दिली आहे.
आत्तापर्यंत, कचार, धेमाजी, होजाई, कार्बी आंगलाँग पश्चिम, नागाव आणि कामरूप (मेट्रो) या सहा जिल्ह्यांतील 94 गावांतील एकूण 24,681 लोक पुरामुळे प्रभावित झाल्याचे आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. तसेच मुसळधार पावसामुळे हाफलांग भागात रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
दरम्यान, दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरयाणा, महाराष्ट्रात तापमानाचा पारा ४० अंशाच्या वर पोहोचला आहे. नागरिक उकाड्यामुळे हैराण आहेत. पण, काही दिवसांतच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, पुढील ४८ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होणार आहे. त्यामुळे देशभरात लवकरच पाऊस बरसणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.