pakistani-hindu-refugess-families 
देश

"800 हिंदू कुटुंबं पाकमध्ये परत गेली, केंद्रासाठी शरमेची बाब"

ट्विटद्वारे केली मोदी सरकारवर जोरदार टीका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतात आश्रयाला असलेले पाकिस्तानातील ८०० हिंदू पुन्हा पाकिस्तानात परतल्याचा दावा करत मोदी सरकारसाठी ही शरमेची बाब असल्याचं भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. स्वामींनी यासंदर्भात ट्विट केलं असून केंद्रावर टीकास्त्र सोडलं आहे. (800 Hindus return to Pakistan matter of shame for Modi govt Criticism of Subramanian Swamy)

सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं की, "मानवाधिकारांचं उल्लंघन झालेले पाकिस्तानातील ८०० हिंदू पीडित जे भारताच्या आश्रयाला आले होते. या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळेल अशी आशा होती. पण मोदी सरकारनं सीएए कायद्यावर आद्याप कार्यवाही सुरु न केल्यानं निराश झालेले हे लोक पुन्हा पाकिस्तानात परतले आहेत, ही बाब केंद्रातील भाजप सरकारसाठी शरमेची बाब आहे"

सन २०११ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारनं पाकिस्तानात राहणाऱ्या ज्या हिंदू कुटुंबियांना अत्याचाराला सामोर जावं लागलं होतं, त्यांना दीर्घकालिन व्हिसा म्हणजेच एलटीव्ही देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर शेकडो हिंदू आणि शीख धर्मीय लोक भारतात आले होते. पण सुमारे दहा वर्षांनंतरही भारताची नागरिकता मिळू न शकल्यानं ८० हिंदू कुटुंबांना नाईलाजानं पाकिस्तानात परतावं लागलं आहे. या कुटुंबांनी नागरिकता मिळावी यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये अनेक चकरा मारल्या, पण त्यांचं काम झालं नाही. पाकिस्तानी अल्पसंख्यांक प्रवाशांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या भारतातील सीमांत लोकसंगठन या संघटनेनं हा दावा केला आहे. यावरुन सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्राला सुनावलं आहे.

दरम्यान, भारतात नागरिकत्व संशोधन कायदा अर्थात सीएए लोकसभेत सन २०१९ मध्ये मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आदी देशांमधील पीडित अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन धर्मिय जे डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आले आहेत त्यांना भारताची नागरिकता देण्यात येणार आहे. या कायद्यावरुन देशभरात मोठा क्षोभ झाला होता, दरम्यान अद्याप या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT