accident between truck and scorpio nine killed at uttar pradesh 
देश

ट्रक-मोटारीत भीषण अपघात; नऊ जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था

प्रतापगड (उत्तर प्रदेश): प्रतापगड जिल्ह्यातील नवाबगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रक आणि स्कॉर्पियो यांच्यात आज (शुक्रवार) पहाटे झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार पुरुष, तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त स्कॉ्र्पियोमधील प्रवासी हे बिहारमधील भोजपूर येथून राजस्थानमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. नवाबगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्कॉर्पियोची एका कंटेनर जोरात ट्रकला धडक बसली. यावेळी झालेल्या अपघातात नऊ जणांचा जागीत मृत्यू झाला. चेंदामेंदा झालेल्या चारचाकीमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस करटचा वापर करावा लागला. या स्कॉर्पियोचा ड्रायव्हर अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातावेळी जोरदार पाऊस सुरू होता. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. शिवाय, जखमींवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी कनेक्शन; IAS सह DCP, ACP दर्जाच्या महिला अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता, आवडत्या पोस्टिंगसाठी...

Why Gold Prices Falling During War : गुंतवणूकदार चक्रावले! सोन्यात 22 हजार तर चांदीत 58 हजारांची विक्रमी घसरण; खरेदीसाठी हीच योग्य वेळ?

YEIDA: एअरपोर्ट शेजारी स्वतःचं घर घेण्याची सुवर्णसंधी! नवी प्लॉट स्कीम लाँच; पाहा किती आहे किंमत आणि कसा करायचा अर्ज

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त! RBIच्या मोठ्या निर्णयाआधी उलटफेर; जाणून घ्या आजचा ताजा भाव

९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलेलं प्रकरण काय होतं? कोर्टाने का म्हटलं ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’?

SCROLL FOR NEXT