Manish Tiwari advised the Congress party
Manish Tiwari advised the Congress party esakal
देश

..तर काँग्रेसवर ही वेळ आली नसती; आझादांच्या राजीनाम्यानंतर तिवारींनी पक्षाला दिला सल्ला

सकाळ डिजिटल टीम

'दोन वर्षांपूर्वी आमच्यापैकी 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाची स्थिती चिंताजनक असल्याचं सांगितलं होतं.'

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काल शुक्रवारी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) पाच पानी पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिला. या राजकीय घटनेनंतर राज्यसभा खासदार मनीष तिवारी (Manish Tiwari) यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला सल्ला दिलाय.

पक्षाच्या स्थितीबाबत G-23 नं काँग्रेस सुप्रिमोला पत्र लिहिलं असतं, त्याकडं लक्ष दिलं असतं, तर आज अशी परिस्थिती उद्भवली नसती, असं त्यांनी म्हटलंय. त्याचवेळी तिवारींनी आपली भूमिका स्पष्ट करताना मी भाडेकरू नसून या पक्षाचा सदस्य असल्याचं म्हटलंय. तिवारी म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी आमच्यापैकी 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाची स्थिती चिंताजनक असल्याचं सांगितलं होतं. ते गांभीर्यानं घ्यायला हवं होतं. त्या पत्रानंतर सर्व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला."

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना तिवारी पुढं म्हणाले, 1885 पासून अस्तित्वात असलेला काँग्रेस पक्ष आणि भारत यांच्यातील समन्वयात दुरावा निर्माण झाल्याचं दिसतं. याबाबत आत्मपरीक्षण आवश्यक होतं. मला वाटतं की, 20 डिसेंबर 2020 रोजी सोनिया गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ही परिस्थिती मांडली आली तर, ही वेळ आली नसती. याबद्दल स्पष्टीकरण देण्यास त्या सर्वोत्तम स्थितीत असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. ज्या व्यक्तीकडं वॉर्डाची निवडणूक लढवण्याचाही दर्जा नाही, तो एकेकाळी काँग्रेस नेत्यांचा चपरासी होता. तो आता पक्षाबद्दल ज्ञान देतो, त्याचं मला हसू येतं. मी या पक्षाला 42 वर्षे दिली आहेत. त्यामुळं आम्ही या संस्थेचे म्हणजेच काँग्रेसचे भाडेकरू नाही, तर आम्ही पक्षाचे सदस्य आहोत. आता तुम्ही आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलात तर ती वेगळी बाब आहे, असंही तिवारी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT