Akhilesh Yadav
Akhilesh Yadav Akhilesh Yadav
देश

BJPला कसं कळलं प्रचार डिजिटल होणार? अखिलेश यादव यांचा सवाल

सुधीर काकडे

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2022) जशा जवळ येत आहेत, तसं राजकीय वातावरण आणखीच तापत असल्याचं पाहायला मिळतंय. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून, मोठ्या प्रमाणात राजकीय टीका टिपण्या केल्या जाता आहे. सपानेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी आता भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. पंजाबमध्ये (Punjab) ज्याप्रकारे खुर्च्या रिकाम्या होत्या, तसंच चित्र सगळीकडे पाहायला मिळालं असतं म्हणून, म्हणून भाजपने निवडणूक आयोगाच्या आडून सभा रॅलींवर बंदी घातल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

भाजपने सभा घेतली असती तर गर्दी झाली नसती, त्यामुळे भाजपने जाणीवपूर्वक निर्बंध लादले गेले आहेत, असा आरोप समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. भाजपची एक गाडी हॉर्न वाजवत फिरतेय, ज्यामध्ये एलईडी बसवलेले आहेत. दहा दिवसांत अशी वाहनं तयार झालीत का? निवडणूक डिजिटल पद्धतीने होणार हे त्यांना कसं कळलं? निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांपूर्वी भाजप नेत्यांच्या घरात डिजिटल वॉर रूम कशी तयार होती. याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत असंही अखिलेश म्हणाले.

दरम्यान, भाजपच्या आमदारांना मारहाण केली जातेय, तरीही सांगितलं जातंय की, सर्व्हे चांगलाच येत आहे. त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाला विरोध होता, हे सर्वेक्षणात कधी येणार? असाही प्रश्न यादव यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, चप्पल घालणारे लोक विमानात प्रवास करतील, असं आश्वासन भाजपने जनतेला दिलं होतं, पण आज सर्वसामान्यांना त्यांच्या वाहनात पेट्रोल-डिझेल भरता येत नाहीये. असं एकही घर नाही जिथं लोक बेरोजगार नाहीत असे गंभीर आरोप अखिलेश यादव यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT