देश

CM चन्नी, अमित शहा एकत्र; केजरीवालांच्या 'त्या' वक्तव्यामुळे वाद पेटला

सुधीर काकडे

पंजाब विधानसभा निवडणुका (Punjab Assembly Elections 2022) तोंडावर येऊन ठेपल्या असताना पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच आम आदमी पक्षाचे (AAP) सर्वेसर्वा अरिवंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केलेलं वक्तव्य आणि कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. केजरीवाल यांनी खलिस्तानी (Khalistan) संघटनांबद्दल काही धक्कादाय वक्तव्य केल्याचा आरोप त्यांचे माजी सहकारी कुमार विश्वास यांनी केलाय. तर त्याविरुद्ध आता पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एकत्र आल्याचे दिसत आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी केली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवालांच्या या वक्तव्याची चौकशी होईल असं सांगितलं आहे. त्यामुळे अमित शहा आणि चन्नी यांनी केजरीवालांना घेरण्याचं काम केल्याचं दिसतंय. तर मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही केंद्र सरकार आणि चन्नींना धारेवर धरलंय.

केजरीवाल म्हणाले की, देशाच्या सुरक्षेच्या विषयाची थट्टा केलीय. पुढच्या काही दिवसांत एनआयए माझ्याविरोधात FIR दाखल करेल, मात्र मी त्या कारवाईचं स्वागत करेल. या प्रकरणात चन्नी आणि अमित शहांवर निशाणा साधताना केजरीवाल म्हणाले की, सगळे एक झाले आहेत. मोदी, राहुल, प्रियंका हे म्हणताय की, केजरीवाल गेल्या 10 वर्षापासून देशाचे दोन तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही तर थट्टा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT