ANI
देश

'लोकसंख्येचा स्फोट, अप्रवासी मुस्लिमांनी कुटुंब नियोजन करावं'

सूरज यादव

गुवाहाटी - आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी राज्यातील अप्रवासी मुस्लिमांना कुटुंबांनी कुटुंब नियोजनाचा सल्ला दिला आहे. जमिनीवरचं वाढतं अतिक्रमण थांबवायचं असेल तर अप्रवासी मुस्लिमांनी कुटुंब नियोजनाचं पालन केल्यास शक्य होईल असं म्हटलं आहे. राज्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्राचा उल्लेख करताना हिंमत बिस्वा शर्मा यांनी म्हटलं की, लोकसंख्येचा स्फोट असाच सुरु राहिला तर एक दिवस कामाख्या मंदिराची जमीनसुद्धा ताब्यात घ्यावी लागेल. एवढंच काय तर माझ्या घरावरही अतिक्रमण होईल. हिमंत बिस्वा शर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.

गुवाहाटीतील एखा कार्यक्रमात त्यांनी अतिक्रमण विरोधातील कारवायांबाबत प्रश्नावर उत्तर देताना हे वक्तव्य केलं. आसाममध्ये ज्याठिकाणी लोकांनी स्थलांतर केलं आहे तिथं अतिक्रमण हटवण्याची मोहिम सुरु आहे. अशा ठिकाणी अप्रवासी मुस्लिमांचे प्रमाण जास्त आहे. आसामच्या काही भागात बंगाली भाषिक मुस्लिम बांगालादेशमधून आलेले आहेत असं म्हणतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने असं म्हटलं होतं की, आसाममधील मूळ लोकांनी यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे.

आसामच्या 3.12 कोटी लोकसंख्येमध्ये अप्रवासी मुस्लिमांचे प्रमाण जवळपास 31 टक्के इतकं आहे. 126 विधानसभेच्या जागांपैकी 35 जागांचा निकाल लागण्यामध्ये यांची भूमिका महत्त्वाची ठरते. मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या विधानसभेच्या अधिवेशनात लोकसंख्या निती लागू करण्यात आली आहे. आम्ही अल्पसंख्यांक मुस्लिम समुदायासोबत मिळून काम करू इच्छितो.

लोकसंख्येचा स्फोट यामुळे गरीबी, अतिक्रमण यांसारख्या सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. जंगल, मंदिर आणि मठांशी संबंधित वनांच्या जमिनीवर अतिक्रमणाची परवानगी दिली जाऊ शकत नाही. मात्र मला वाटतं की यामागे वाढती लोकसंख्या हे कारण आहे.

लोकसंख्या नियंत्रणात ठेवता आल्यास अनेक सामाजिक प्रश्न सोडवता येतील. जर अप्रवासी मुस्लिमांनी कुटुंब नियोजनाच्या नियमांचे पालन केलं तर हे शक्य होईल. त्यासाठी माझं त्यांना आवाहन आहे असंही मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT