BCCI announces its official stand on the much-anticipated India vs Pakistan cricket match.

 

esakal

देश

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

BCCI statement on India vs Pakistan match : या सामन्याला भारतामधून जोरदार विरोधही सुरू आहे. शिवाय, बीसीसीआयवरही टीका, टिप्पणी केली जात आहे

Mayur Ratnaparkhe

BCCI Clears Stand on India vs Pakistan Match: आशिया कप २०२५मध्ये उद्या(रविवार) भारत विरुद्ध पाकिस्तान हे दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ आमने-सामने येणार आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या दोन्ही देशांमधील संबध कमालीचे ताणले गेलेले आहेत. अशात या सामन्याला भारतामधून जोरदार विरोधही सुरू आहे. शिवाय, बीसीसीआयवरही टीका, टिप्पणी केली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उद्या होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ‘आज तक’शी बोलताना उद्याच्या या महामुकाबल्यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांनी भारतीय संघ पूर्ण उत्साहाने मैदानात उतरेल अशी आशाही व्यक्त केली.

याचबरोबर देवजीत सैकिया म्हणाले, "मला विश्वास आहे की भारतीय खेळाडू जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरतील. असे करणे हे त्या घटनांना योग्य उत्तर असेल ज्या आपण जास्त लक्षात ठेवू इच्छित नाही. भारताला अशा देशासोबत खेळावे लागत आहे, ज्याच्याशी आपले चांगले संबंध नाहीत. परंतु बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणे हे भारत सरकारचे धोरण आहे. म्हणूनच आपण या सामन्यांना नकार देऊ शकत नाही."

याआधी माजी क्रीडमंत्री अनुराग ठाकूर यांनीही उद्याच्या या सामन्याबाबत प्रतिक्रिया देताना, नेमकं का हा सामना भारताला खेळावा लागत आहे, यामागचे कारण सांगितले होते. टीम इंडियाला आशिया कप किंवा विश्वचषक सारख्या बहुपक्षीय स्पर्धांमध्ये खेळणे अनिवार्य झाले आहे. असे न केल्यास भारताला स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल आणि प्रतिस्पर्धी संघाला विजयी घोषित केले जाईल, त्यांना अधिकचे गुण मिळतील. मात्र भारत आणि पाकिस्तान कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

SCROLL FOR NEXT