Bihar_Tarkishore_Prasad 
देश

काय सांगता! बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचं वय पाच वर्षांत वाढलं १२ वर्षांनी

सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा (बिहार) : राजकीय नेत्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे अनेकदा पाहायला मिळते, पण बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांचे वय पाच वर्षांत दुपटीपेक्षा जास्त वाढले असल्याचे आढळल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत कटिहार मतदारसंघातून विजयी झालेले भाजप नेते आणि आताचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे वय पाच वर्षांत १२ वर्षांनी वाढले आहे. प्रसाद यांनी वेगवेगळ्या निवडणुकांसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांत वयाबाबत वेगवेगळी माहिती दिली आहे.

२०१०मध्ये त्यांनी त्यांचे वय ४९ वर्षे असल्याचे सांगितले होते. २०१५मधील निवडणुकीत ते ५२ वर्षांचे झाले. म्हणजे पाच वर्षांत त्यांचे वय तीन वर्षांनी वाढले. २०२०मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचे वय ६४ वर्षे असल्याचे नमूद केले आहे. यानुसार २०१५ आणि २०२० दरम्यान प्रसाद यांचे वय १२ वर्षांनी वाढले, तर २००५ आणि २०१० दरम्यान त्यांचे वय केवळ एका वर्षांनी वाढले.

‘चुकीच्या जन्मतारखेत खोटेपणा नाही’
वयाच्या या तफावतीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी या गोष्टीला विनाकारण महत्त्व दिले असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, माझा जन्म ५ जानेवारी १९५६ रोजी झाला. प्रतिज्ञापत्रात जन्मतारीख असते. नजरचुकीने मी त्यावर चुकीची जन्मतारीख लिहिलेली असू शकते. मात्र, यात कोणताही खोटेपणा केलेला नाही.

 - देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT