Nitishkumar-and-tejashwi
Nitishkumar-and-tejashwi 
देश

बिहार रणसंग्राम : नेत्यांच्या जुगलबंदीने प्रचाराची सांगता

सकाळन्यूजनेटवर्क

नितीश व तेजस्वी यांची एकमेकांवर टीका; महागाई, बेरोजगारीचे मुद्दे गाजले
पाटणा - ‘बिहारमध्ये रोजगारासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ने अनेक कामे केली आहेत. दहा लाख बेरोजगारांसाठी प्रशिक्षण दिले आहे. ‘जीविका’च्या (बिहार ग्रामीण उपजीविका योजना) माध्यमातून २० लाख महिलांना जोडून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे,’’ असे सांगून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दला (आरजेडी)चे नेते तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सर्व पक्षांनी सभांमधून विरोधकांवर निशाणा साधत सत्तेवर येण्याचा दावा केला.  राज्यातील पहिल्या टप्प्यातील प्रचार आज समाप्त झाला. मुझफ्फरनगरमधील सभेत नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, की बिहारचा अर्थसंकल्प २४ हजार कोटी रुपयांचा होता. आता तो दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. बिहारमधील गुन्हेगारीवर आम्ही नियंत्रण आणले असून यात आपल्या राज्याचा क्रमांक २३ वे स्थान आहे. आमचे लक्ष कामावर आहेत तर अनेक जण प्रचारावरच जोर देत आहेत.

नितीश कुमार यांची आश्‍वासने

  • पाच तासांत राजधानीत पोचण्याचे लक्ष्य
  • प्रत्येक जिल्ह्यात तंत्रज्ञान संस्था सुरू करणार
  • विद्यार्थी क्रेडिट कार्डावर चार लाख रुपये देणार
  • जनतेच्या मदतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार 

कांदा भाववाढीवर भाजप गप्प
‘महागाईची समस्या गंभीर आहे. भाजप नेत्यांना कांद्याचे हार घालण्याची सवय झाली आहे. पण आता कांदा १०० रुपये किलो झाला आहे. कांदा जेव्हा ५० ते ६० रुपये किलो होता तेव्हा त्यावर बोलणारे लोक आता गप्प बसले आहेत. शेतकरी उद्‍ध्वस्त होत आहेत. युवक बेरोजगार आहेत आणि उपासमारी वाढत आहे,’’ अशी टीका राष्ट्रीय जनता दला (आरजेडी)चे नेते तेजस्वी यादव यांनी सोमवारी भाजपवर टीका केली.

बिहारच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तेजस्वी यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘‘ कांद्याचे भाव ८० रुपयांवर गेले आहेत. मात्र आधी ५०-६० रुपये भाववाढ झाली तरी गदारोळ करणारे भाजप नेते आता गप्प बसले आहेत. बेरोजगारी, उपासमारी वाढत असून गरिबीचा विळखा घट्ट होत आहे. शेतकरी, छोटे व्यापारी देशोधडीला लागत आहेत. सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) घसरले आहे. आपण आर्थिक गर्तेत अडकत आहोत.

पहिल्या टप्प्यातील ७१ जागांसाठी उद्या मतदान
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाली. १६ जिल्ह्यांमधील ७१ जागांसाठी बुधवारी (ता.२८) मतदान होईल. आठ मंत्र्यांसमवेत अनेक दिग्गजांचे भवितव्य उद्या मतदान पेटीत बंदिस्त होणार आहे. 

पहिल्या टप्प्यात शिक्षण मंत्री कृष्णनंदन प्रसाद वर्मा हे जहानाबाद मतदारसंघातून उभे आहेत. कृषी मंत्री प्रेम कुमार, ग्रामीण कार्य मंत्री शैलेश कुमार, विज्ञान मंत्री जय कुमारसिंह, महसूल मंत्री  रामनारायण मंडल, कामगार मंत्री विजय कुमार सिन्हा, खणीकर्म मंत्री बृजकिशोर बिंद, परिवहन मंत्री संतोष कुमार निराला आदी मंत्री रिंगणात आहे. याशिवाय हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम)चे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी हेही रिंगणात आहेत. भारतीय नेमबाज व भाजपची उमेदवार श्रेयसीसिंह, काँग्रेसचे नेते 
- अनंतसिंह, लोकजनशक्तीचे राजेंद्रसिंह, भगवानसिंह कुशवाह हेही मैदानात आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT