chirag paswan 
देश

नितीश कुमार चुकून परत CM झालेच तर राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाईल

सकाळवृत्तसेवा

पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच प्रचाराला रंग चढला असून  प्रचाराने उंचीही गाठली आहे. आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला आता वाढला आहे. लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज बुधवारी बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, जर नितीश कुमार चुकून येत्या निवडणुकीत पुन्हा निवडून आले तर  राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाईल.  आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

जर विद्यमान मुख्यमंत्री चुकून पुन्हा निवडून आले तर हा राज्याचा पराभव असेल आणि बिहार राज्य हे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाईल. ते जातीवादाला चालना कसे काय देतात याचं मला आश्चर्य वाटतं. जो माणूस जातीयवादाला चालना देतो त्या माणसाच्या नेतृत्वात बिहार राज्याच्या विकासाची कल्पना करणे योग्य ठरणार नाही. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला. 

बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट असं मोठं ध्येय ठेवून बिहारच्या विकासासाठी हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचं पासवान यांनी म्हटलं आहे. आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करतोय. गेल्या अनेक वर्षांपासून बिहार ज्या प्रश्नांशी झुंजतो आहे, त्या प्रश्नांला सोडवण्यासाठी म्हणून बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट हे ध्येय ठेवलं आहे. 

चिराग पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील बिहार एनडीएचाच भाग होती. मात्र, सत्तेत राहूनही आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जेडीयूशी असलेले मतभेद पुढे करत लोजपाने स्वंतत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपाशी असलेलं आपलं सख्य लोजपाने तोडलं नाहीये. केंद्रात एनडीएशी सख्य मात्र राज्यात दुरावा, अशी लोजपाची भुमिका राहीली आहे. लोजपाने जेडीयूविरोधात उमेदवार उभे केले आहेत तर भाजपाविरोधात फक्त पाच ठिकाणी उमेदवार उमेदवार उभे करुन ही खेळीमेळीची स्पर्धा आहे, असं म्हटलं आहे. 

243 जागांसाठी बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान हे 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान 3 आणि 7 नोव्हेंबररोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT