kapil sibal 
देश

'काँग्रेसला उत्तरेच शोधायची नाहीयेत; आत्मपरिक्षणाची वेळही निघून गेलीय'

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या खराब कामगिरीबाबत आता जेष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मौन सोडलं आहे. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलंय की, लोकांनी काँग्रेसकडे प्रभावी पर्याय म्हणून पाहिले नाहीये तसेच पक्षाच्या नेतृत्वाने पक्षाला भेडसावत असणाऱ्या समस्यांकडे लक्ष दिलेले नाहीये. काही दिवसांपूर्वीच कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या २२ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्यात त्यांचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. 

हेही वाचा - विराट अनुष्काचा कुत्रा म्हणणाऱ्या नेटकऱ्यांना काँग्रेस प्रवक्त्याचे खडे बोल, म्हणाले...
काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या समस्या आणि त्यांची उत्तरे माहित आहेत पण काँग्रेसला ती उत्तरे शोधायच्या मार्गात येणाऱ्या अडचणींना ओळखायचेच नाहीये. आमच्यातील काहींनी आमचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी आमच्याकडे पाठ फिरवली. आणि आपण सगळे त्याचे परिणाम पाहतोय. फक्त बिहारमधीलच नव्हे तर देशातील लोक जिथे कुठे पोटनिवडणुका होतायत तिथे काँग्रेसला एक चांगला पर्याय म्हणून पाहत नाहीत. गुजरातच्या पोटनिवडणुकीत देखील काँग्रेसला पराभव बघायला लागला. तीन ठिकाणी उमदेवारांचे डिपॉझीट जप्त होण्याची वेळ आली. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीतही असेच घडले. देशातील लोक आपल्याकडे सक्षम पर्याय म्हणून पाहतच नसल्याचे दिसून येतंय, असं त्यांनी म्हटलंय. 

पुढे त्यांनी म्हटलंय की, आत्मपरिक्षण करण्याची वेळदेखील आता निघून गेली आहे. काँग्रेस वर्कींग कमिटीचे एक माझे सहकारी मला म्हणाले की, मी आशा करतोय की काँग्रेस पुन्हा आत्मपरिक्षण करेल. जर गेल्या सहा वर्षांत काँग्रेसने आत्मपरिक्षण केले नसेल तर आता काय आशा आहेत याच्या? आम्हाला चांगलं माहितीय की काँग्रेसमध्ये काय चुकतंय.

संघटनात्मकरित्या काय चुकतंय हेही ठाऊक आहे. सगळ्याची उत्तरे आहेत. काँग्रेसला स्वत:ला उत्तरे माहित आहेत. पण उत्तरे शोधायची इच्छा नाहीये, ही अडचण आहे. असं असेल तर काँग्रेसचा आलेख घसरताच राहणार आहे. काँग्रेसने धाडस दाखवून या प्रश्नांच्या उत्तरांना बगल देण्याऐवजी त्यांना लक्ष्यात घ्यायला हवं. 
सिबल यांनी पुढे म्हटलंय की, या समस्या लक्षात घ्यायला असमर्थता यासाठी दिसून येते कारण काँग्रेस वर्कींग कमिटी ही निर्विचित आहे.  लोकशाही प्रक्रिया स्वीकारल्या गेल्या पाहिजेत. अगदी काँग्रेस वर्कींग कमिटीच्या घटनेत सुद्धा ती असायला पाहिजे. काँग्रेसच्या घटनेत लोकशाहीची तरतूद दिसून येते. पण निर्वाचित सदस्यांकडून तुम्ही प्रश्न विचारण्याची अपेक्षा करुच शकत नाही.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT