Supreme-Court 
देश

कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या नातेवाइकांना समान भरपाईची मागणी करणारी याचिका फेटाळली

पीटीआय

नवी दिल्ली - कोरोना संसर्गामुळे मरण पावलेल्यांच्या नातेवाइकांना समान नुकसान भरपाई देण्यासाठी वेगळे राष्ट्रीय धोरण अमलात आणले जावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने इन्कार केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

न्या. अशोक भूषण आणि न्या. आर.एस. रेड्डी यांच्या खंडपीठाने प्रत्येक राज्याचे वेगळे धोरण असून ते त्यांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे भरपाई देत असल्याचे सांगितले. देशभरात सर्वांना समान भरपाई मिळावी म्हणून एक वेगळे धोरणच आखले जावे अशी मागणी याचिकाकर्ते हाशीक थायीकांडी यांनी सादर केली होती. 

दिल्लीमध्ये राज्य सरकार एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देते पण काही राज्ये एक लाखांची भरपाई देत आहेत, यामुळे समान भरपाईसाठी वेगळे धोरण आखले जावे असे या याचिकेमध्ये नमूद करण्यात आले होते. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनीच ऐनवेळी माघार घेण्याची मागणी केली असल्याने आम्ही ही याचिका फेटाळून लावत आहोत असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

आजचे राशिभविष्य - 13 सप्टेंबर 2025

Weekend Breakfast Idea: वीकेंडला सकाळी नाश्त्यात झटपट बनवा दुधीभोपळ्याचे सँडविच, सोपी आहे रेसिपी

Nagpur Accident: खापा मार्गावर आयशरने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Beed Crime: पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; गुन्हा दाखल, कौटुंबिक वादातून अंबाजोगाई शहरातील घटना

SCROLL FOR NEXT