corona third wave
corona third wave esakal
देश

तिसरी लाट तीव्र की सौम्य? फेब्रुवारी-मार्चदरम्यान उद्रेकाचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेतला तर युरोपमध्ये डिसेंबरदरम्यान कोरोनाचा संसर्ग (coronavirus) मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचे आढळते. त्यानंतर दोन ते तीन महिन्यांत म्हणजेच फेब्रुवारी- मार्चमध्ये आपल्याकडे प्रादुर्भाव वाढायला सुरुवात होते. दरम्यान रशिया, जर्मनीसह विविध देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, भारतात फेब्रुवारी- मार्चदरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. पण तिसरी लाट घातक असेल की तीव्र? याबाबत तज्ञांनी इशारा दिला आहे.

तिसरी लाट फेब्रुवारी- मार्चमध्ये?

देशात ऑगस्टपासून जवळपास निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले, मात्र असे असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव फारसा वाढलेला नाही. मृतांचे प्रमाणही हळूहळू कमी होत आले आहे. त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी फेब्रुवारी- मार्चमध्येच येईल. परंतु, ती सौम्य प्रमाणात असेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले. जर्मनी, रशियातील प्रादुर्भाव वाढण्यास प्रामुख्याने करोनाचे ‘डेल्टा’ हे उत्परिवर्तन कारणीभूत ठरले आहे. भारतात ‘डेल्टा’चा उगम झाला. देशात दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढण्यास ‘डेल्टा’च कारणीभूत होता. आता देशातील नागरिकांमध्ये ‘डेल्टा’विरोधात बऱ्यापैकी प्रतिकारशक्ती निर्माण झाली असून, लसीकरणाचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे भविष्यात करोनाचे उत्परिवर्तन झाले तरी ते घातक नसेल तर तिसरी लाट सौम्य असेल. तसेच करोनाचे उत्परिवर्तन होण्याचा वेग कमी झाला असून, गेल्या काही महिन्यांत नवे उत्परिवर्तन आढळलेले नाही. त्यामुळे ‘डेल्टा’ इतके घातक उत्परिवर्तन निर्माण होण्याची शक्यता कमी आहे, परंतु होणारच नाही असे ठामपणे सांगता येणार नाही, असे मत तज्ञांनी व्यक्त केले.

....म्हणून दुसऱ्या लाटेला तोंड द्यावे लागले

राज्यात दुसरी लाट ओसरली असली तरी मुंबईत दररोज सुमारे तीनशे रुग्ण आढळत आहेत, तर राज्यात हे प्रमाण सुमारे एक हजार आहे. त्यामुळे करोनाची साथ पूर्णत: संपलेली नाही. वातावरणात अजूनही विषाणू आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन, चाचण्या, निदान यावर भर न दिल्यास कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तनाची शक्यता नाकारता येत नाही, गेल्या वर्षी याच काळात कोरोनाची पहिली लाट ओसरली होती, परंतु करोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी होता. कोरोनाची साथ संपल्याचा गैरसमज करून नागरिकांनी प्रतिबंधाचे सर्व नियम धुडकावून लावले होते. परिणामी कोरोनाचे उत्परितर्वन झाले. ‘डेल्टा’ने फेब्रुवारीपासून पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आणि आपल्याला दुसऱ्या लाटेला तोंड द्यावे लागले.

विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला तरी वातावरणात त्याचे अंश असतात. विषाणूविरोधात नागरिकांमध्ये तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे विषाणूची ताकद कमकुवत व्हायला सुरुवात होते, अशावेळी अधिक तीव्रतेने रोगप्रतिकारक शक्तीविरोधात लढण्यासाठी विषाणू स्वत:च्या रूपामध्ये बदल करून अधिक शक्तिशाली बनतात. यालाच विषाणूचे उत्परिवर्तन म्हणतात. जितका काळ विषाणू अधिक संख्येने वातावरणात राहील तितके त्याचे परावर्तन होण्याची शक्यता अधिक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT