देश

सोडून दिलेल्या मृतदेहांमुळे गंगा मैली

किनाऱ्यावर साचलेल्या पाण्यातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो असा इशारा

उज्वलकुमार

पाटणा: उत्तर प्रदेशप्रमाणे बिहारमधून वाहणाऱ्या गंगा नदीतही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले आहेत. यामुळे गंगेतून जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य आजारांच्या संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली. कोरोना विषाणूचा विचार केला तर त्याचा संसर्ग नदीच्या पाण्यातून होण्याची शक्यता बिलकूल नाही. पण जर नदीत सोडलेले मृतदेह किनाऱ्यावर साचलेल्या पाण्याच्या संपर्कात आले तर तेथून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. (Dead Bodies in Ganga River can be spreader of coronavirus)

गंगेतील मृतदेह कोरोनाबाधितांचे असल्याचा सांगण्यात येत असून असे मृतदेह नदीत सोडण्यावरील बंदीचे सक्तीने पालन न केल्यास गंगेतून जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य आजारांच्या संसर्गाचा धोका निर्माण होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये गंगेत आढळलेले मृतदेह उत्तर प्रदेशमधून वाहत आल्याचा दावा राज्य सरकारने करीत आहे. मात्र संशोधकांच्या मते मृतदेहांमुळे नदीचे प्रदूषण आणि अन्य आजाराचे भय आहेच. नदीत मृतदेहांचे पूर्णपणे विघटन होणे अवघड असते. अशा वेळी मृतदेहाच्या संक्रमित शरीराच्या माध्यमातून जीवाणू आणि बुरशीजन्य आजार पसरण्याचे धोका आहे. नदीतील जलचरांना कोरोना होण्याची शक्यताही नगण्य आहे, असे त्यांनी सांगितले.

नदीतील मृतदेह हे काही प्रकारचे मासे व कासव खातात. या मृतदेहावर वाढलेले जिवाणू आणि बुरशी त्यांच्या पोटात जाते. मासे हे मानवाचे खाद्य असल्याने त्यामाध्यमातून नुकसानकारक घटक खाण्यात आल्यास अनेक आजारांना ते निमंत्रण ठरू शकते.

संशोधकांचा इशारा

  • गंगेत मृतदेह सोडण्याचा प्रकार दीर्घकाळ सुरू राहिल्यास नदीच्या पर्यावरणावर घातक परिणाम

  • पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटेल

  • जीवाणूंची वाढ मोठ्या प्रमाणात होईल

  • जलचरांवर परिणाम नाही

  • मानवाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता

नदीत सोडलेल्या मृतदेहांवर जिवाणूंची वाढ मोठ्या प्रमाणात होऊन गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. जीवाणू आणि बुरशीजन्य आजारांचा सर्वांत जास्त धोका आहे. अशा पाणी पिण्‍यासाठी, अंघोळीसाठी वापरले तर अनेक प्रकारचा संसर्ग होऊ शकतो.

- प्रा. आर. के. सिन्हा, जलचर संशोधक

------------------------------------

कोरोनाव्हायरसची लागण झालेला मृतदेह किनाऱ्याला लागलेला असेल, तर तेथील पाण्याला स्पर्श करणेही घातक ठरू शकते. पण तेथे त्याच्या पोषणासाठी माध्यम नसल्याने हा विषाणू जास्त काळ टिकू शकत नाही.

- प्रा. वीरेंद्र प्रसाद, जैवतंत्रज्ञान विभाग, पाटणा विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT