delhi election 2020 arvind kejriwal will be cm for third time 
देश

Delhi Elections:अच्छे होंगे पाँच साल, दिल्ली मे तो केजरीवाल!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या सर्वच्या सर्व जागांचे कल आता हाती येऊ लागले आहेत. त्यात भाजपच्या गेल्या वेळच्या जागांच्या तुनलेत वाढ होताना दिसत आहे. तर, आम आदमी पक्ष 67 जागांवरून खाली येताना दिसत आहे. तरीही दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचेच सरकार सत्तेवर येणार हे स्पष्ट झाले आहे.

क्झिट पोलमधील सर्व अंदाज खरे ठरवत आज, आम आदमी पक्षाने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आघाडी घेतली. गेल्या निवडणुकीत 67 जागांवर विजयी झालेला आम आदमी पक्ष यावेळी थोड्या कमी जागांवर विजयी होण्याची शक्यता दिसत आहे. पण, हा बदल अपेक्षित असला तरी, दिल्लीत पुन्हा आपचीच सत्ता येणार हे स्पष्ट होत आहे. त्यामुळं आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर जल्लोषाचं वातावरण दिसत आहे. निकालांचे कल जाहीर होत आहेत. त्यानुसार आपला 50 ते 55 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 15-20 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप तीन जागांवरून 15-20 जागांवर विजय मिळवत असल्यानं भाजपसाठी ही सकारात्मक बाब आहे. पण, दिल्लीत सत्तांतर करण्यात भाजपला अपयश येत असल्याचं दिसत आहे. 

केजरीवाल आघाडीवर पण...
अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यांना भाजपचे सुनील यादव जोरदार टक्कर देत आहेत. केजरीवाल सध्या आघाडीवर असले तरी ती आघाडी 2 हजार मतांच्या आसपास आहे. त्यामुळं नवी दिल्लीत केजरीवाल विरुद्ध यादव अतिशय चुरशीची लढत पहायला मिलत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT