Delhi High Court
Delhi High Court Sakal
देश

दिल्ली हायकोर्टाने वैवाहिक बलात्कार याचिकांवरील निकाल ठेवला राखून

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) वैवाहिक बलात्कार गुन्हा ठरविणाऱ्या याचिकांवरील निकाल राखून ठेवला आहे. भारतातील साक्षरता, आर्थिक दुर्बलता, महिला सक्षमीकरणाचा अभाव, गरिबी अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे भारताने या प्रकरणात अत्यंत सावधपणे पुढे जावे, असे मत केंद्र सरकारचे या प्रकरणावर व्यक्त केले आहे. (Criminalisation Of Marital Rape.)

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांमध्ये वैवाहिक बलात्कार (Rape) गुन्हा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यावर कलम ३७६ अंतर्गत आरोपींना शिक्षा करण्याच्या अनेक तरतुदी असल्याचे केंद्राचे मत आहे. यामध्ये दुखापतीच्या खुणा, मारहाण, शरीराच्या एखाद्या भागाला बळजबरीने स्पर्श करणे आदींचा समावेश आहे. परंतु वैवाहिक बलात्कारात या पुराव्यांची पुष्टी करणे कठीण असल्याचे केंद्राचे मत आहे.

या प्रकरणी केंद्र सरकारने दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, कोणत्याही कायद्यानुसार वैवाहिक बलात्काराची व्याख्या केलेली नाही. तर कलम ३७५ अंतर्गत बलात्काराची व्याख्या करण्यात आली आहे. त्यामुळे अशा घटना गुन्हा म्हणून घोषित करण्यासाठी व्यापक आधाराची आवश्यक असल्याचे केंद्राने दिलेल्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यासाठी समाजाचे एकमत होणे आवश्यक आहे. याशिवाय वैवाहिक बलात्कार म्हणजे काय? हे देखील सांगणे गरजेचे आहे. भारतात साक्षरता, आर्थिक दुर्बलता, महिला सक्षमीकरणाचा अभाव, गरिबी अशी अनेक कारणे आहेत, त्यामुळे या प्रकरणात भारताला अत्यंत सावधपणे पुढे जावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT