Supreme-Court
Supreme-Court 
देश

निवडणूक रोख्यांना स्थगिती नाही; केंद्र व आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस

पीटीआय

नवी दिल्ली - राजकीय पक्षांना निधी देण्याचा पर्याय असलेल्या निवडणूक रोख्यांना (इलेक्‍टोरल बॉंड) स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून, या याचिकेवर प्रतिसाद देण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणूक रोख्यांच्या वापराला अंतरिम स्थगिती देण्याची याचिकेतील मागणी मात्र न्यायालयाने फेटाळून लावली. 

निवडणूक रोख्यांविरोधात एका स्वयंसेवी संस्थेने याचिका दाखल केली असून, सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. निवडणूक रोख्यांची योजना म्हणजे काळा पैसा सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी वापरण्यासाठीचा उपाय आहे, असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी केला आहे. आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ भूषण यांनी रिझर्व्ह बॅंकेने प्रसिद्ध केलेली काही कागदपत्रेही सादर केली. ही कागदपत्रे पाहून दोन आठवड्यांनंतर सुनावणी घेऊ, असे खंडपीठाने सांगितले. या याचिकेवर दोन आठवड्यांत प्रतिसाद देण्यास केंद्र आणि निवडणूक आयोगाला सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी दहा दिवसांसाठी निवडणूक रोख्यांची विक्री सुरू केली आहे. केंद्र सरकारने निवडणूक रोखे योजना दोन जानेवारी 2018 ला मंजूर केली. या योजनेनुसार भारतीय नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती निवडणूक रोखे खरेदी करू शकते. अखेरच्या लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत एक टक्‍क्‍यांहून अधिक मते मिळविलेल्या पक्षांनाच हे रोखे स्वीकारण्याचा अधिकार आहे. अधिकृत बॅंकेतील खात्यांद्वारेच या रोख्यांचे रोख रकमेत रूपांतर करता येते. 

निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेला निधी (2019) 
1,450 कोटी रुपये : भाजप 
383 कोटी रुपये : कॉंग्रेस 
192 कोटी रुपये : तृणमूल कॉंग्रेस 
5000 कोटी रुपये : मार्च 18 ते मे 19 पर्यंत झालेले वाटप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT