Maharashtra Ekikaran Samiti esakal
देश

Karnataka Election : म.ए समितीच्या उमेदवारांचा मोठा पराभव; मराठी भाषिकांनी 'सीमाप्रश्नी' घेतला महत्वाचा निर्णय

गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra Ekikaran Samiti) अनेक चढ-उतार पाहिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

समितीने कधीही निवडणूक हे आपले ध्येय ठेवले नसून सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेणे हेच समितीचे मुख्य ध्येय आहे.

बेळगाव : गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra Ekikaran Samiti) अनेक चढ-उतार पाहिले आहेत. विधानसभा निवडणुकीत समितीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरी याचा कोणताही परिणाम सीमालढ्यावर होणार नाही.

आगामी काळात सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेण्यासाठी अधिक ताकदीने लढण्याचा निर्धार मराठी भाषिकांतून केला जात आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यापासून सीमाप्रश्नाची सोडवणूक करुन घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांचा लढा सुरू आहे.

सीमालढ्याचा एक भाग म्हणून समितीने आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढविल्या आहेत. या निवडणुकांमध्ये कधी यश तर कधी अपयश मिळाले आहे. मात्र, मराठी भाषिकांची महाराष्ट्रात जाण्याची जिद्द थोडीही कमी झालेली नाही. यावेळी प्रत्येक मतदारसंघात समितीने एकच उमेदवार दिला होता, तरीही समितीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांकडून समितीला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मात्र, समितीने कधीही निवडणूक हे आपले ध्येय ठेवले नसून सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेणे हेच समितीचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे निवडणुकीतील पराभवामुळे आलेली निराशा दूर सारुन पुन्हा एकदा समितीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लवकर व्हावी. साक्षी पुरावे नोंदविण्याच्या कामाला सुरुवात व्हावी याकडे समितीने लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीला यापूर्वीही निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, समिती किंवा येथील मराठी भाषिक कधीही लढ्यापासून दूर गेलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पराभवामुळे आलेली मरगळ झटकून नव्याने लढ्यासाठी उभे राहावे. कार्यकर्त्यांनी निराशा झटकून मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर करून घेण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज व्हावे, असे मत व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती सीमालढ्याचा एक भाग म्हणून निवडणूक लढवत असते. आगामी काळात अधिक जोमाने आणि ताकदीने सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज झाले पाहिजे. समितीने आतापर्यंत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे समितीचे कार्यकर्ते खचून जात नाहीत. उलट अधिक जोमाने कार्य करतात, हे लवकरच दिसून येईल.

-मालोजी अष्टेकर, सरचिटणीस, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT