Belgaum Satish Jarkiholi Sambra Airport esakal
देश

Belgaum News : ऐन पावसाळ्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात पाडला कृत्रिम पाऊस; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दोन दिवस बेळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यात तीन दिवस कृत्रिम पावसाचे नियोजन आहे. शुक्रवारी गोकाक व खानापुरात कृत्रिम पाऊस पाडला.

बेळगाव : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना अनुकूल व्हावे, या दृष्टीने जिल्ह्यात काल (ता. २९) आणि आज (ता. ३०) असे दोन दिवस कृत्रिम पाऊस (Artificial Rain) पाडण्याचा प्रयोग करण्यात येत आहे. हुदली येथील बेळगाम शुगर यांच्यावतीने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

शुक्रवारी (ता. २९) दुपारी त्याचा प्रारंभ जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांच्या हस्ते पार पडला. येथील सांबरा विमानतळावर (Sambra Belgaum Airport) आलेल्या विशेष विमानातून रासायनिक द्रवांची फवारणी ढगांवर करण्यात येत आहे. मोजक्या ढगांवर रासायन फवारुन कृत्रिम पाऊस पडण्याचा प्रयोग करण्यात येत आहे.

यासाठी नागरी विमानोड्डाण महासंचालय कार्यालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी (ता. ३०) दोन दिवस बेळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न आहेत. विमानाचे कॅप्टन वीरेंद्र सिंग आणि कॅप्टन आदर्श पांडे यांच्या नेतृत्वाखाली विमानाद्वारे रासायनिक द्रवांची फवारणी करण्यात येत आहे. कमी अंतरावर असणाऱ्या ढगांच्या आकर्षणासाठी सीएसीएल टू आयोडाइड आणि २० हजार फूट अंतरावर असणाऱ्या ढगांच्या आकर्षणासाठी सिल्वर आयोडाइड रासायन फवारणी करण्यात येत आहे.

एखाद्या वेळेस निर्दिष्ट प्रदेशाच्या कार्यक्षेत्रात ढग जमल्यास रासायनिक द्रवांची फवारणी झालेल्या काही मिनिटात पावसाला सुरुवात होणार आहे. तर ढग नसल्यास फवारणी न करताच विमान परतणार आहे, अशी माहिती विमानाच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह उत्तरचे आमदार असिफ सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवा नेते राहुल जारकीहोळी आदींसह अन्य उपस्थित होते.

वातावरण पोषक

शुक्रवारी बेळगाव परिसरात पावसासाठी आवश्यक ढग आढळून आल्याने कृत्रिम पावसासाठी हे वातावरण पोषक असल्याचा अभिप्राय कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. ५ ते १० हजार फूट अंतरावर असणाऱ्या ढगांवर सिल्वर आयोडाइडची फवारणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

कृत्रिम पावसाचे उद्दिष्ट पूर्ण - पालकमंत्री

जिल्ह्यावर दुष्काळाची छाया असल्याने कृत्रिम पाऊस पाडण्याची शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी आज पूर्णत्वास आली असल्याची प्रतिक्रीया पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे. हुदली येथील बेळगाव शुगर्स प्रा.लि.च्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. २९) सांबरा विमानतळावर कृत्रिम पाऊस उपक्रमाचा प्रारंभ करून पत्रकारांसमोर ते बोलत होते. कृत्रिम पावसासाठी केंद्राकडून २० दिवसांनंतर मंजुरी मिळाली आहे.

जिल्ह्यात तीन दिवस कृत्रिम पावसाचे नियोजन आहे. शुक्रवारी गोकाक व खानापुरात कृत्रिम पाऊस पाडला. शनिवार आणि रविवारीही हा उपक्रम राबविण्यात येईल. प्रति दिनी तीन तास उपक्रम राबविण्यात येईल, विमानाने एकदा उड्डाण केली की, त्याचा संचार आकाशात तीन तास सुरू राहणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT