union minister narendra tomar 
देश

केंद्रीय कृषीमंत्री शेतकऱ्यांवर भडकले; 11 वी बैठकही तोडग्याशिवाय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - कृषी कायद्यावरून शेतकरी आणि सरकारमधील 11 वी बैठकसुद्धा निष्फळ ठरली. या बैठकीत काहीच तोडगा न निघाल्यानं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकऱ्यांवर रागावले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं पावित्र्य नष्ट झालं आहे. काही लोक याचा राजकीय फायदा घेत आहेत. 

भडकलेल्या कृषीमंत्र्यांनी म्हटलं की, आम्ही सर्वात चांगला प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला आहे. मात्र काही लोकांकडून आंदोलन चालवलं जात असून त्यावर तोडगा निघू नये हेच पाहिलं जात आहे. अद्याप काही मार्ग निघालेला नाही कारण आंदोलक संघटनांमध्ये शेतकऱ्यांचं हित पाहणारे नाहीत. शेतकरी संघटना सातत्यानं कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत. तर सरकारने अनेक पर्याय असलेले प्रस्ताव दिले आहेत. 

बैठकीनंतर नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, भारत सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि गरिबांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि राहील. विशेषत: पंजाबचे शेतकरी आणि इतर काही राज्यातील शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनावेळी सातत्यानं जनता आणि शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. याचा फायदा घेऊन चांगल्या कामाच्या विरोधात असलेले काही लोक शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहेत. 

भारत सरकारचा प्रयत्न होता की ते योग्य विचार करतील. यासाठी 11 वी बैठक बोलावली होती. मात्र शेतकरी संघटना कायदा मागे घेण्याचा हट्ट करत आहेत. सरकारने एकापाठोपाठ एक प्रस्ताव दिले पण आंदोलनाचं पावित्र्य नष्ट होतं तेव्हा तोडगा निघत नाही. चर्चेच्यावेळी मर्यादांचे पालन झाले तर शेतकऱ्यांच्या हिताचं काही करता येईल. मात्र ही भावनाच नसल्यानं काहीच निर्णय होत नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्री तोमर म्हणाले. 

कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत 11 चर्चेच्या फेऱ्या झाल्या तरीही काहीच तोडगा निघलेला नाही. सरकारने शेतकरी संघटनांसोबत पुढच्या बैठकीसाठी कोणती तारीख दिलेली नाही. आता शेतकरी संघटनांनी आम्ही दिलेल्या प्रस्तावावर विचार करावा असं सरकारने म्हटलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT