Farmers_Protest
Farmers_Protest 
देश

'खिळ्यांची होणार फुले'; शेतकऱ्यांची दिल्ली बॉर्डरवर गांधीगिरी!

सकाळ डिजिटल टीम

Farmers Protest: नवी दिल्ली : गाझीपूर सीमेवरील महामार्गावर शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलिस आणि केंद्र सरकारने जेथे अणकुचीदार खिळे लावले होते, त्याच रस्त्यावर आणि त्याच जागी आंदोलनकर्ते शेतकरी विविध फुलझाडांची लागवड करणार आहेत. केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या अॅक्शनला शेतकऱ्यांनी गांधीगिरीने उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. 

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले की, ‘‘ग्रामीण भागातून दोन डंपर माती मागविण्यात आली आहे. पोलिसांच्या खिळ्यांना उत्तर म्हणून येथेच आता विविधरंगी सुगंधी फुले डोलतील. आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी आपापल्या गावाकडे परत जाताना येथील ही माती बरोबर नेऊन आपल्या शेतात टाकावी. ज्याद्वारे त्यांना दिल्लीच्या या ऐतिहासिक आंदोलनातील त्यांचा संघर्ष आणि सहभागाची कायम आठवण राहील.’’

दरम्यान, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ६ फेब्रुवारी देशभरात चक्का जाम करण्यात येणार आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड हे तीन राज्य वगळता देशभरात सर्वत्र चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिली.

शनिवारी (ता.६) आम्ही दिल्लीमध्ये चक्का जाम आंदोलन करणार नाही, पण सर्व सीमाभागात आम्ही शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करणार आहोत. दिल्ली वगळता सर्व राज्यातील प्रमुख राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात येणार आहेत. दुपारी १२ ते ३ या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती दर्शनपाल सिंह यांनी दिली. तर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांतही चक्का जाम आंदोलन करण्यात येणार नाही, यावर  भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी शिक्कामोर्तब केले. 

सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता आंदोलन संपेल. त्यानंतर एक मिनीटभर आपापल्या गाड्यांचे हॉर्न वाजवण्यात येतील. इंटरनेट सेवा बंद असल्याने खूप अडचणी येत आहेत, अशी माहिती टिकैत यांनी दिली. 

देशभरातील नागरिकांनी आपापल्या गावी, आपापल्या भागात चक्का जाम आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे, असे आवाहनही टिकैत यांनी केले. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT