rahul_20gandhi_20narendra_20modi 
देश

शेतकऱ्यांच्या बलिदानानंतरही मोदींच्या हृदयाला पाझर फुटेना; काँग्रेसची बोचरी टीका

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. यावरून आता मोदी सरकारवर काँग्रेसनं निशाणा साधला आहे. काँग्रेसनं असा दावा केला आहे की, कृषी कायद्याविरोधातील या आंदोलनादरम्यान 11 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. इतक्या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटलेला नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका वृत्ताचा दाखला देत ट्विट केलं आहे की, कृषी कायद्याला हटवण्यासाठी आमच्या किती भावंडांना आणखी किती आहुती द्यावी लागेल? 

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही ट्विट केलं आहे. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, गेल्या 17 दिवसांमध्ये 11 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंततरही मोदी सरकारला त्याबद्दल काहीच वाटत नाही. सरकार अजुनही अन्नदात्यांच्या नाही तर धन दांडग्यांच्या बाजूने उभा आहे का? राजधर्म मोठा आहे की यांचा हट्ट? असाही प्रश्न सुरजेवाला यांनी विचारला आहे.

अहमद खानने दिले कोरिओग्राफर रेमो डिसूजाचे हेल्थ अपडेट्स

दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांवर वॉटर कॅननने पाण्याचा फवाराही करण्यात आला होता. सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या आंदोलनावेळी आजारी पडल्यानंतर 11 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातमीचा दाखला देत काँग्रेसनं मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

दरम्यान, एका वृत्त वाहिनीशी बोलताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारला पुन्हा एकदा इशारा देताना हे आंदोलन त्यांच्या जीवनाचा लढा आहे असं म्हटलं. सरकार जर कायद्यात 14 सुधारणा करण्यास तयार आहे तर मग कृषी कायदा मागेच का नाही घेत असाही प्रश्न रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. 

PowerAT80 : हार के जीतनेवाला बाजीगर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी FICCI च्या सर्वसामान्य वार्षिक बैठकीत कृषी कायद्यावर त्यांचे म्हणणे मांडले आहे. कृषी कायद्यावरून शेतकरी आंदोलन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित उद्योगांमध्ये अनेक अडथळे आहेत. आता हे अडथळे हटवण्यात येत आहेत. याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होईल. यामुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्यास मदत होईल असंही मोदींनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT