Indian Railway esakal
देश

कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे 12 डबे उलटले, रेल्वे ट्रॅकचं मोठं नुकसान

सकाळ डिजिटल टीम

कोळशाच्या तुटवड्यामुळं देशातील अनेक राज्यांमध्ये विजेचं संकट निर्माण झालंय.

कोळशाच्या तुटवड्यामुळं देशातील अनेक राज्यांमध्ये विजेचं संकट निर्माण झालंय. एकीकडं औष्णिक वीज केंद्रांवर कोळशाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार अनेक पावलं उचलत असताना दुसरीकडं मालगाडीचे 12 डबे उलटले आहेत. इटावा जिल्ह्यात (Etawah District) हा अपघात झाला आहे.

कोळशानं भरलेली मालगाडी कानपूरहून (Kanpur) गाझियाबादच्या (Ghaziabad) दिशेनं कोळसा घेऊन जात होती. या मालगाडीचे सुमारे 12 डबे इटावा जिल्ह्यातील फ्रेट कॉरिडॉरवर रुळावरून घसरले असून हे डबे कोळशानं भरलेले होते. सुमारे डझनभर डबे उलटल्यानंतर कोळसा सर्वत्र पसरला होता. यात रेल्वे ट्रॅकचं नुकसान झालंय. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांसह पोलिस प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. हा अपघात OHE पोल 615/21 ते 615/27 दरम्यान रेल्वे स्थानकाजवळ झालाय.

या अपघातात दोन खांबही तुटून पडले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, कोळशाचे डबे मधूनच तुटले आहेत. घटनास्थळी पोहोचलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ग्रामीण सत्यपाल सिंह यांनी सांगितलं की, सुरक्षेसाठी पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सध्या रेल्वेचे डबे हटवण्याचे काम सुरुय. या अपघाताची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT