wedding sakal
देश

'या' गावात बायको प्रेग्नंट होताच नवरा करतो दुसरं लग्न, कारण ऐकूण थक्क व्हाल

बायको गरोदर असताना नवरा खुशाल दुसरं लग्न करतो.

सकाळ डिजिटल टीम

भारतात वेगवेगळ्या भागात अनेक प्रथा आहेत.कधी कधी काही प्रथा या अविश्वसनीय वाटतात. सध्या राजस्थानच्या एका गावची प्रथा चांगलीच व्हायरल होतेय. या प्रथेनुसार बायको गरोदर झाली की नवरा दुसरं लग्न करतो.हो, हे खरंय.

भारतात पहिल्या बायकोला घटस्फोट न देता दुसऱ्या लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे.अशात बायको गरोदर असताना नवरा खुशाल दुसरं लग्न करतोय. विशेष म्हणजे या लग्नाला गरोदर बायकोही समर्थन देते. सध्या सर्वत्र या प्रकरणाची चर्चा होतेय.

ही अजब प्रथा राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील देरासर गावातील आहे.कित्येक वर्षापासून ही प्रथा पाळली जाते. विशेष म्हणजे या प्रथेमागील कारण ऐकाल तर थक्क व्हाल. बायको प्रेग्नंट असताना नवरा दुसरे लग्न पाण्यासाठी करतो. हो, या गावात पाण्याची समस्या आहे आणि गावातील महिला कित्येक मैल पायपीट करून पाणी आणतात.मग त्यासाठी स्वत: महिला गरोदर असताना नवऱ्याचे दुसरे लग्न लावून देतात.

बायको गरोदर झाल्यावर घरकामाचा विशेष म्हणजे कित्येक मैल पायपीट करुन पाणी आणण्याचा प्रश्न निर्माण होतो.आणि या गावातील पुरुष घरकाम करत नाहीत.त्यामुळे दुसरं लग्न पर्याय उत्तम असतो.यामुळे गरोदर पत्नीला आराम मिळते त्यामुळे तिला या लग्नाचा काहीच त्रास होत नाही. सध्या या गावाची प्रथा चर्चेचा विषय ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: 'मी तुम्हाला बोलावलंच नाहीये...' जेव्हा जसप्रीत बुमराहची सटकते; विमानतळाबाहेर रिपोर्टर्सवर भडकला

Pune : लालपरीची काय ही अवस्था? दरवाजाच नाही, तरी प्रवाशांच्या सेवेत; जीव धोक्यात घालून प्रवास

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्थानक परिसरात शिवसेनेचा मोर्चा

Solapur: ७६ वर्षांनंतर सीनानदी धोक्याच्या पातळीवर; १९४९ नंतरचा सर्वात मोठा पूर, पातळी ४३०.६ मीटरवर

'तिला थंडी ताप आला त्याचं वेळी जर...' आईच्या आठवणीत तेजस्विनीला भावूक होऊन म्हणाली...'आयुष्याचा काही नेम नाही..'

SCROLL FOR NEXT