Yogi-Adityanath Team eSakal
देश

"१९४७ मध्ये मोदींसारखं नेतृत्व असतं तर भारत सर्वाधिक समृद्ध असता"

"भारताची आज जी ओळख आहे ती मोदींमुळे आहे"

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. भारताला जर १९४७ साली मोदींसारखं नेतृत्व मिळालं असतं तर भारत जगातील सर्वाधिक समृद्ध देश बनला असता, असं त्यांनी म्हटलं आहे.

योगी म्हणाले, "भारताला सध्या जी ओळख मिळाली आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं, कारण त्यांनी जगाला भारतीय दृष्टी दिली. १९४७ मध्ये भारताकडे अशा प्रकारचं यशस्वी नेतृत्व असतं तर भारत जगातील सर्वाधिक समृद्ध देश, मोठी सामरिक शक्ती आणि आर्थिक ताकदवान देश बनला असता"

"स्वातंत्र्यानंतर यापूर्वीच्या सरकारांच्या कालखंडांमध्ये कधीही असं काम झालं नाही. म्हणजेच भारताचा गौरव व्हावा असं एकही काम झालं नाही. जो लोक विभाजनाचं काम करतात ते प्रत्यक्षात तालिबानीकरणाला समर्थन देण्याचं काम करत आहेत. जे लोक सध्या जिन्नाचं समर्थन करत आहेत ते एक प्रकारे तालिबान्यांचंही समर्थन करत आहेत"

विरोधकांकडे आता कोणताही मुद्दा नाही. त्यांना सरदार पटेलांचा अपमान करायचा आहे. एकीकडे राष्ट्राचे नायक सरदार पटेल आहेत तर राष्ट्राचे विभाजन करणारे जिन्ना दुसरीकडे आहेत. ते लोक जिन्नांचे समर्थन करतात तर आम्ही पटेलांचं समर्थन करतो, असंही यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT