देश

नियतीचा अजब खेळ, अपघातात चौघांचं हसतं-खेळतं कुटुंब संपलं

अपघात इतका भीषण होता की, ट्रक कारला अक्षरक्ष: काही मीटर अंतरापर्यंत फरफटत घेऊन गेला.

दीनानाथ परब

भोपाळ: मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात (Madhya pradesh satna district) बुधवारी रात्री भीषण अपघात (Accident) झाला. ट्रक (Truck) आणि कारच्या (Car) समोरासमोर झालेल्या धडकेत एका चौकोनी कुटुंबाचा दुर्देवी शेवट झाला. जोडप्याचा आणि त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक कारला अक्षरक्ष: काही मीटर अंतरापर्यंत फरफटत घेऊन गेला.

चौघांचा चिरडून मृत्यू झाला. सत्यम उपाध्याय (४१), पत्नी मानिका (३८) आणि त्यांची दहा वर्षांची मुलगी इशानी यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा स्नेहने गुरुवारी सकाळी रुग्णालयात उपचारा दरम्यान प्राण सोडले. हे कुटुंब सतना शहरातून त्यांच्या घरी मायहार येथे चालले होते. तिथे उपाध्याय यांच मोबाइलचं दुकान आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

सतनामध्ये ते काही मित्रमंडळींना भेटले व ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले. याच फोटोपैकी चौघे एकत्र जेवायला बसल्याचा फोटो आहे. हाच फोटो व्हायरल झाला असून हा त्यांचा शेवटचा फोटो असल्याचे बोलले जात आहे.

कार्यक्रम आटोपून हे कुटुंब कारने निघालं. अवघ्या पाच किमी अंतरावर गेल्यानंतर जीत नगर येथे ट्रकने धडक दिली. अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर फरार झाला होता. पण नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. स्थानिक राजकरण्यांनी अपघातासाठी रस्ता बांधणाऱ्या कंपनीला दोष दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT