Indian-Economy 
देश

कोरोनाच्या लाटेमध्येही भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत - RBI

विविध राज्यांमधील लॉकडाउनचा परिणाम महागाई वाढण्यात होऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येही भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ चांगल्या प्रकारे सुरु असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपल्या मासिक बुलेटिनमध्ये म्हटलं आहे. परंतू, संसर्गाची जोखीम वाढल्याने निर्बंधांमुळे महागाईचा दबाव वाढत असल्याचंही आरबीआयनं म्हटलं आहे.

आरबीआयनं म्हटलं, "संपर्क केंद्रीत क्षेत्रांव्यतिरिक्त, सक्रीय क्षेत्रे मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात लवचिक राहिली आहेत आणि त्यामुळे व्यवसायांवर परिणाम होण्याऐवजी कोरोनाच्या तीव्र संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील व्यावसायांच्या सर्व स्तरांत वाढ झाली आहे"

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काही राज्यांत अजूनही स्थानिक लॉकडाउन सुरु आहेत. या कठोर नियमांमुळे पुरवठा साखळी खंडीत होऊ शकते आणि त्यामुळे सन २०२० मध्ये महागाईच्या चिंतेत भर पडू शकते. आरबीआयला आशा आहे की, लवकरच कॉर्पोरेट कमाई, क्षमतांचा वापर आणि वीज वापरात झालेल्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेतील आर्थिक मिळकत कायम राहील.

बाजाराला प्रोत्साहन मिळणं आवश्यक

आरबीआयनं म्हटलं की, "या सकारात्मक मासिक घडामोडींमुळे एकमेकांना बळकटी मिळते आणि मध्यम मुदतीच्या कालावधीत वाढ होते. देशाच्या धोरणकर्त्यांना माहिती आहे की, अशा बिकट काळात त्वरीत बाजाराला प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे महागाईच्या भीतीपेक्षा त्यावरील दबाव कमी होण्याची भीती कमी आहे. म्हणूनच बहुतेक केंद्रीय बँका महामारीच्या काळात वाढीच्या दिशेने झुकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT