Asha Devi 
देश

इंदिरा जयसिंह यांच्या माफीबाबतच्या वक्तव्यावर निर्भयाची आई म्हणाली...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ज्येष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी दिल्लीत सामुहिक बलात्कार झालेल्या निर्भयाची आईने बलात्काऱ्यांना माफी देण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर तिच्या आईने त्यांचे असे बोलण्याचे धाडसच कसे झाले असे म्हटले आहे.

इंदिरा जयसिंह यांनी ट्विट करत म्हटले होते, की ज्या पद्धतीने सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांची मारेकरी नलिनीला माफ केलं आणि तिला फाशी देऊ नये अशी मागणी केली होती तसेच निर्भयाच्या आईनेही करावे. मला आशादेवी यांच्या वेदनेची पूर्णपणे जाणीव आहे. मात्र मी त्यांना आवाहन करते की त्यांनी सोनिया गांधी यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे. सोनिया यांनी नलिनीला माफ केले होते आणि म्हटले होते की तिला फाशीची शिक्षा होऊ नये. आम्ही तुमच्यासोबत आहोत मात्र फाशीच्या शिक्षेविरोधात आहोत.

याविषयी बोलताना निर्भयाची आई आशादेवी म्हणाल्या, की मला हा सल्ला देणाऱ्या इंदिरा जयसिंह कोण आहेत? माझ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी व्हावी, अशी पूर्ण देशाची इच्छा आहे. अशा लोकांमुळेच देशात बलात्कार पिडीतांना न्याय मिळत नाही. इंदिरा जयसिंह यांचे असे बोलण्याचा धाडसच कसे झाले, यावर माझा विश्वास बसत नाही. मला कधी त्या विचारण्यास आल्या नाहीत आणि आज थेट त्यांच्या माफीची मागणी करत आहेत.  

‘निर्भया’ सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणी चार दोषींना 1 फेब्रुवारीला पहाटे 6 वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकवले जाणार आहे. यापूर्वी 22 जानेवारीला या नराधमांना फाशी देण्यात येणार होती. मात्र कायदेशीर प्रक्रियेमुळे फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलली आहे. चार नराधमांपैकी एक मुकेश सिंहने केलेला दयेचा अर्ज दिल्लीच्या नायब राज्यपालांनी शुक्रवारी फेटाळला होता. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दयेचा अर्ज फेटाळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT