caa main.jpg 
देश

पुढील महिन्यापासून CAA कायदा लागू होऊ शकतो, भाजप नेत्याने दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- येत्या जानेवारीपासून देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू होण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या संख्येने राहत असलेल्या शरणार्थिंना नागरिकत्व देण्यासाठी केंद्र सरकार आणि भाजप इच्छुक असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला शरणार्थींप्रती कोणतीही सहानुभूती नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

राज्यातील 24 परगणा जिल्ह्यात पक्षाच्या 'आर नोय किसी' अभियानाच्या शुभारंभप्रसंगी माध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले की, आम्हाला आशा आहे की, सीएए अंतर्गत शरणार्थींना नागरिकत्व देण्याची प्रक्रिया पुढील वर्षी जानेवारीत सुरु होईल. केंद्र सरकारने शेजारील देशांतून आपल्या देशात येणाऱ्या शरणार्थिंना नागरिकत्व देण्याचा प्रामाणिक हेतूने सीएए कायदा संमत करण्यात आला आहे. 

कैलाश विजयवर्गीय यांच्या या वक्तव्याचा तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) समाचार घेतला आहे. टीएमसीचे ज्येष्ठ नेते तथा राज्यमंत्री फरहाद हकीम यांनी भाजपचे नेते पश्चिम बंगालच्या नागरिकांना मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तामधून 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, जैन आणि पारसी शरणार्थींना सुधारित नागरिकत्व कायद्यानुसार भारताचे नागरिकत्व मिळू शकते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT