caa main.jpg 
देश

पुढील महिन्यापासून CAA कायदा लागू होऊ शकतो, भाजप नेत्याने दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- येत्या जानेवारीपासून देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू होण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या संख्येने राहत असलेल्या शरणार्थिंना नागरिकत्व देण्यासाठी केंद्र सरकार आणि भाजप इच्छुक असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला शरणार्थींप्रती कोणतीही सहानुभूती नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

राज्यातील 24 परगणा जिल्ह्यात पक्षाच्या 'आर नोय किसी' अभियानाच्या शुभारंभप्रसंगी माध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले की, आम्हाला आशा आहे की, सीएए अंतर्गत शरणार्थींना नागरिकत्व देण्याची प्रक्रिया पुढील वर्षी जानेवारीत सुरु होईल. केंद्र सरकारने शेजारील देशांतून आपल्या देशात येणाऱ्या शरणार्थिंना नागरिकत्व देण्याचा प्रामाणिक हेतूने सीएए कायदा संमत करण्यात आला आहे. 

कैलाश विजयवर्गीय यांच्या या वक्तव्याचा तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) समाचार घेतला आहे. टीएमसीचे ज्येष्ठ नेते तथा राज्यमंत्री फरहाद हकीम यांनी भाजपचे नेते पश्चिम बंगालच्या नागरिकांना मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तामधून 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, जैन आणि पारसी शरणार्थींना सुधारित नागरिकत्व कायद्यानुसार भारताचे नागरिकत्व मिळू शकते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT