bjp & jdu 
देश

कमी जागा मिळूनही नितीश CM बनतील का? जेडीयूने दिलं उत्तर

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरु आहे. निकाल सुस्पष्ट झाला नसला तरीही एनडीए आघाडीवर आहे. एनडीएने महागठबंधनहून अधिक जागा जिंकल्या आहेत. जर आणखी काही बदल झाले नाही तर एनडीएच निर्विवादपणे सत्तेत येईल. मात्र, असं असलं तरीही एक वेगळाच पेच उभा राहिला आहे. या निवडणुकीच्या निकालात पहिल्यापासूनच भाजपची आकडेवारी ही जेडीयूहून अधिक दिसत आहे. सध्या भाजपाने 72 जागांवर आघाडी घेतली आहे तर जेडीयूने 42 जागा जिंकल्या आहेत. 

या निवडणुकीचा निकाल काहीही लागो मात्र, एनडीएच्या गोटात भाजप हाच मोठा भाऊ ठरला आहे. आकड्यांनुसार भाजप हा मोठा पक्ष ठरल्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमारच राहतील की भाजपचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून ठरवला जाईल, अशी नविनच चर्चा सध्या होताना दिसतेय. 

हेही वाचा - Bihar Election: CM पदाची स्वयंघोषित दावेदार पुष्पम प्रिया दोन्ही जागांवर पिछाडीवर; EVM हॅकचा दावा
प्रश्न असा आहे की, भाजपा जर मोठा भाऊ ठरत असेल तर नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री बनायला हवं की त्यांनी नैतिकता दाखवून मागे हटायला हवं? जेडीयूचे प्रवक्ता अजय आलोक यांनी या प्रश्नावर उत्तर दिलंय. त्यांनी म्हटलं की एनडीएकडून नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील. भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी हे स्पष्ट केलंय की, मुख्यमंत्री हे नितीश कुमार हेच राहतील. जेडीयू नेत्याने म्हटलंय की, मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात जेडीयूच्या आणखी जागा निश्चितच वाढतील. एकदा स्पष्ट निकाल येऊदे मग याबाबत अधिक मत मांडता येईल, असं त्यांनी म्हटलंय. 

या निवडणूकीत जेडीयूने 115 जागांवर निवडणुका लढवला आहेत. त्यातील सात जागा या हिंदुस्तानी आवाम मोर्च्याला दिल्या. तर भाजपाने 110 जागांवर निवडणुका लढवल्या आहेत. यातील 11 जागा या विकासशील इन्सान पार्टीला दिल्या आहेत. केंद्रात एनडीएसोबत असणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीने राज्यात भाजपशी फारकत घेऊन जेडीयू विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी नितीश कुमारांना विरोध करत त्यांच्या विरोधात उमेदवार उभे केले. त्यामुळे जेडीयूची मते खाण्याचे काम लोजपाने केल्याचे म्हटलं जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या डेडलाइनला पावसाचा फटका! मुंबई-पुणे प्रवासाचा ‘एक्सप्रेस’ स्वप्नाला धक्का; मिसिंग लिंक उशिरा पूर्ण होणार

Rahul Gandhi Reaction : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर राहुल गांधींनी व्यक्त केला संताप ; भाजप सरकावर मोठा आरोप, म्हणाले...

Government Job: महाराष्ट्रात ९३८ सरकारी पदांसाठी भरती; २७ ऑक्टोबरपर्यंतच अर्ज करता येणार, जाणून घ्या प्रक्रिया...

MLA Anna Bansode : माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने यांना राष्ट्रवादीने भरभरून दिले, त्यांना पूर्ण विचार करण्याचा अधिकार

AIIMS Recruitment 2025: एम्समध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख आणि निवड प्रक्रिया

SCROLL FOR NEXT