JEE Main 
देश

JEE मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या, चौथ्या सत्रांच्या तारखा जाहीर

यापूर्वी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांनाही मिळणार संधी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : JEE मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी मंगळवारी याची घोषणा केली. त्यानुसार, जेईई मुख्य परीक्षेचं तिसरं सत्र २० जुलै ते २५ जुलै दरम्यान तर चौथं सत्र २७ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान होणार आहे. (jee main exam dates jee mains ramesh pokhriyal exam)

पोखरियाल यांच्या माहितीनुसार, "जर एखाद्या विद्यार्थ्यानं यापूर्वी तिसऱ्या आणि चौथ्या सत्रासाठी अर्ज केला नसेल तर त्याला आता अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. त्यानुसार, तिसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी ६ जुलै ते ८ जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच चौथ्या सत्रातील परीक्षेसाठी ९ जुलै ते १२ जुलैदरम्यान अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही सत्रांसाठी विद्यार्थ्यांना आपलं परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा ही असणार आहे." सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचं परीक्षा केंद्र उपलब्ध व्हावं यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, असंही पोखरीयाल यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचं पालन करता यावं यासाठी आम्ही परीक्षा केंद्रांच्या संख्येतही वाढ केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

या परीक्षेच्या तिसऱ्या सत्रासाठी ६.८० लाख आणि चौथ्या सत्रासाठी ६.०९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सुरुवातीला देशातील २३२ शहरांमध्ये ही परीक्षा होणार होती. पण आता ती ३३४ शहरांमध्ये होणार आहे. या परीक्षेच्या प्रत्येक शिफ्टमध्ये परीक्षा केंद्रांची संख्या ६६० हून ८२८ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, एनटीएने यावर्षापासून जेईई मेनची परीक्षा चार सत्रांमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली होती. ज्यांपैकी दोन सत्रांची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च २०२१ मध्ये पार पडली. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातील परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार होती. मात्र, कोरोनाच्या उद्रेकामुळं ती पुढे ढकलण्यात आली होती.

परीक्षेसाठी नव्या कोरोना गाईडलाईन्स

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) यासंदर्भात एक नोटीस जाहीर करत परीक्षा केंद्रांमध्ये सोशल डिस्टंसिंगसह कोविडच्या गाईडलाईन्सची संपूर्ण योजना तयार केली आहे.

  1. परीक्षेच्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला एक मास्क दिला जाणार आहे.

  2. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या गेटवर एकत्र येऊ नयेत यासाठी त्यांना वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या आहेत.

  3. ज्या कॉम्प्युटरवर विद्यार्थी परीक्षा देईल तो कॉम्प्युटर पुढील परीक्षेसाठी वापरला जाणार नाही.

  4. डेस्क, खुर्ची, परीक्षा हॉल याला वारंवार सॅनिटाइज केलं जाणार आहे. त्याचबरोबर परीक्षा हॉलमध्ये हवा खेळती राहिल याची काळजी घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT