Bribe News esakal
देश

संतापजनक! तहसीलदाराने मागितली दोन लाखांची लाच; शेतकऱ्यांनी पोटची ९ मुलं गहाण ठेवली

संतोष कानडे

Bribe News : सरकारी अधिकाऱ्यांच्या लाचेचा लोभ वरचेवर वाढतच चालाल आहे. देशाला पोखरुन खाल्लेल्या लाचखोरीचा एक संतापजनक प्रकार घडला आहे.

एका तहसीलदाराने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र शेतकऱ्यांकडे लाच देण्यासाठी पैसे नव्हते. शेवटी त्यांनी पोटच्या ९ मुलांना गहाण ठेवलं.

ही घटना राजस्थनाच्या जोधपूर येथे घडली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जिल्ह्यात ही घटना घडल्याने संताप व्यक्त होतोय. राजस्थानमधल्या या घटनेने देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

जोधपूरमधील फलौदी येथील काही शेतकऱ्यांनी जमिनी वाटणीच्या कामासाठी अर्ज केला होता. मात्र तहसीलदारांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

शेतकऱ्यांसाठी तहसीलदारांना देण्यासाठी दोन लाख रुपये नव्हते, त्यामुळे त्यांनी आपल्या पोटच्या नऊ मुलांना तहसीलदारांकडे ठेवलं आणि तिथून निघून गेले. त्या मुलांनी कालची रात्र तहसीलदारांकडेच काढली.

फलौदी तालुक्यातल्या ढढू गावातले १३ शेतकरी आक्रमक झाले होते. त्यामुळेच त्यांनी ९ मुलांना रात्रभर तहसील कार्यालयात गहाण ठेवलं. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी एसडीएम आणि महसूलचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले.

याप्रकरणी कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याची माहिती नाही. हे प्रकरण १९९८ पासूनचं असल्याची माहिती मिळत आहे. तहसीलदाराने या कामासाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT