Kargil Vijay Diwas सकाळ
देश

Kargil Vijay Diwas: भारताचा पराक्रमी पंतप्रधान जो युद्धावेळी चक्क रणांगणात तळ ठोकून राहिला..

युद्धादरम्यान अटलजी कारगिलला पोहोचले आणि त्यांनी सैनिक आणि अधिकारी यांच्याशी बातचीत करत युद्ध परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांना प्रोत्साहन दिले.

सकाळ डिजिटल टीम

१९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिलमध्ये युद्ध सुरू होते. त्यावेळचे पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांना हे युद्ध कोणत्याही किंमतीवर जिंकायचे होते. जसजसे युद्ध पुढे सरकत गेले, तसतसे अटल बिहारी बाजपेयी यांना कळत होते की हे युद्ध पूर्वी झालेल्या युद्धा इतके सोपे नाही. त्यामुळे त्यांनी स्वतः मैदान-ए-जंग येथे जाऊन सैनिकांना प्रोत्साहन दिले होते.

युद्धादरम्यान अटलजी कारगिलला पोहोचले आणि तेथे ते तब्बल तीन दिवस राहिले. त्यांनी सैनिक आणि अधिकारी यांच्याशी बातचीत करत युद्ध परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांना प्रोत्साहन दिले. (Kargil Vijay Diwas Former Prime Minister Atal Bihari Vajpayee stayed three days in battlefield with soldiers)

पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या रिकाम्या चौक्यांवर स्थायिक झाले असून ते पुढे जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यावेळी भारतीय सैन्याला पाकिस्तानशी क्रॉस युद्ध करायचे होते. त्यासाठी तातडीने राजकीय मंजुरीची गरज होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना गृह आणि संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीची आढावा घेतला.

अटल बिहारी यांच्यासोबत तत्कालीन गृह आणि संरक्षण मंत्री आणि लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक झाली, ज्यामध्ये केवळ समोरासमोरच्या लढ्याला तात्काळ राजकीय मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. उलट या युद्धाच्या रणनीतीचाही विचार करण्यात आला. या बैठकीतच अटलबिहारी यांनी पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका मांडली होती. त्यानंतर लगेचच पंतप्रधानांकडून युद्धाला राजकीय मंजुरी देण्यात आली आणि लष्करांसाठी मार्ग मोकळा केला.

लढाईचे मैदान नसल्यामुळे सैन्याना शत्रू डोळ्याने दिसत नव्हता. शत्रुला आधी शोधायचे आणि नंतर त्याचा नायनाट करायचा. हे युद्ध जिंकण्यासाठी किती वेळ लागेल हे कोणालाच माहीत नव्हते. परंतु तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी, इतर मंत्री आणि लष्कराच्या उच्च अधिकाऱ्यांनी ठरवले की बर्फ वितळताच भारतीय सैन्य कारगिल शिखरांवर हल्ला करेल आणि बर्फ पडण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत विजयची खात्री केली जाईल. कारगिल युद्ध मे मध्ये सुरू झाले आणि 26 जुलै रोजी ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी पार पडले म्हणजेच कारगिल युद्ध भारताने जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT