satpal nischal 
देश

धक्कादायक! नव्या नियमानुसार काश्मीरचा रहिवासी बनला पण दहशतवाद्यांनी केली हत्या

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर जमीन कायद्यात बदल झाले आहेत. या नव्या कायद्यानुसार सर्वात पहिलं रहिवासी प्रमाणपत्र घेतलेल्या सतपाल निश्चल यांचा खून झाल्यानं खळबळ उडाली आहे. दहशतवादी हल्ल्यात निश्चल यांचा मृत्यू झाल्यानं व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. निश्चल हे काश्मीरमध्ये पहिले रहिवासी प्रमाणपत्र घेणारी व्यक्ती होते. 

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 17 वर्षांपासून ते सरायबाला इथं भाडेकरू म्हणून राहत होते. निश्चल यांनी कष्टाच्या जोरावर यश मिळवलं होतं. त्यांनी श्रीनगरमधील उच्चभ्रू वस्तीत घर उभारलं आहे. गेल्या 25 वर्षांपासून ते इथं राहत होते. भूमी कायद्या बनल्यानंतर सतपाल निश्चल आणि त्यांच्या कुटुंबियांना नुकतंच रहिवासी प्रमाणपत्र मिळालं होतं. निश्चल यांनी भूमी कायदा अस्तित्वात आल्यानंतर आपलं आणि कुटुंबाचं रहिवासी प्रमाणपत्र तयार करून घेण्याचा निर्णय घेतला होता आणि ते मिळालंही होतं. 

या प्रकरणात रहिवासी प्रमाणपत्रामुळेच खून झाल्याचं म्हटलं जात आहे. दहशतवाद्यांनी सतपाल यांचा खून करून असाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, काश्मीरमध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी रहिवासी प्रमाणपत्र घेण्याचा विचार जरी केला तरी त्यांची अवस्था वाईट करू. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानं बाहेरच्या राज्यातील लोकांना मालमत्ता खरेदी आणि रहिवासी प्रमाणपत्र घेण्याचा कायद्याने हक्क मिळाला होता. याला काश्मीरमध्ये विरोधही करण्यात आला होता. 

पोलिस सध्या सतपाल निश्चल यांच्या खूनाचा तपास करत आहेत. कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे. मात्र बहुतांश काश्मीरी लोकांचे म्हणणे आहे की, हा खून काश्मीरमध्ये बाहेरून आलेल्या लोकांना भीती घालण्यासाठी करण्यात आला आहे. सतपाल यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी सरायबाला इथं त्यांचे शेजारी असलेले शाबिर अहमद गेले होते. त्यांनी सांगितलं की, आम्ही मिळून कित्येक सण, उत्सव साजरे केले. सतपाल यांच्या हत्येनं मोठा धक्का बसला असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT