Sharad Pawar on LK Advani 
देश

Sharad Pawar on Advani: अडवाणींना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर शरद पवार म्हणाले, उशीर झाला पण...

केंद्र सरकारनं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न घोषित केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न घोषित केला आहे. काही दिवसांपूर्वी बिहारमधील दिवंगत समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला.

या पुरस्कारांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. उशीर झाला पण योग्य निवड झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Late but right Sharad Pawar comment on announced L K Advani Bharatratna award)

आडवाणींशी झाले होते मतभेद

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, "भारतरत्नसाठी जाहीर झालेली कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी ही दोन्ही नाव योग्य आहेत. कर्पुरी ठाकूर हे बिहारमधील तर आडवाणी संसदेत अनेक वर्षी होते. आडवाणींचा कधीही पराभव झाला नाही. त्यांनी रथयात्रा काढली त्यावेळी आमचे मतभेद झाले होते, असंही पवारांनी यावेळी सांगितलं. (Latest Marathi News)

योग्य निवड

भाजप नेते, संसदेचे सभासद आणि मंत्री म्हणून त्यांची निवड उशीरा झाली पण योग्य निवड झाली. अडवाणींना योग्य सन्मान मिळाला आहे, आता त्यावर समाधान व्यक्त करणं एवढचं गरजेचं आहे. त्यांच्या पक्षात काय घडलं? याच्या खोलात मी जात नाही, असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT