bose sakal
देश

देशद्रोहासारखे कायदे रद्द करावेत : बोस

वसाहतकालिन कायद्यांमुळे देशातील लोकशाहीला मोठा धोका

सकाळ न्यूज नेटवर्क / पीटीआय

कोलकता : देशद्रोहासारखे वसाहतकालिन कायदे, ज्यांचा वापर असंतोषाचा आवाज दाबण्यासाठी केला जातो, ते रद्द करायला हवेत, अशी अपेक्षा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू सुगत बोस यांनी शुक्रवारी व्यक्त केली. सुगत बोस हे २०१४मध्ये जादवपूर लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून विजयी झाले होते. पण गेल्या वेळी मात्र त्यांनी निवडणूक लढविली नव्हती. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व गांधी कुटुंबीयांचे ते निकटवर्तीय आहेत. (Politics News)

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्यात बोस यांचा प्रमुख सहभाग असू शकतो. ‘लोकशाहीच्या समर्थनार्थ गुणवत्तापूर्ण बदल करण्यात महत्त्वाची भूमिका निभावू इच्छितात, असे ते म्हणाले. यातून बोस लवकरच राजकारणात सक्रिय होणार असल्याचे मानले जात आहे. ते नेताजी संशोधन मंडळाचे अध्यक्ष व हॉर्वर्ड विद्यापाठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत. वसाहत काळातील ज्या कायद्यांचा उपयोग नेताजी बोस, महात्मा गांधी आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या स्वातंत्र्यसेनानींना गप्प करण्यासाठी केला जात असे, ते कायदे अद्याप सरकारकडून वापरले जात आहेत, याबद्दल बोस यांनी चिंता व्यक्त केली.

‘‘आपल्या लोकशाहीचा पाया आपल्याला मजबूत करायला हवा. त्यासाठी असे अवैध वसाहतवादी कायदे फेकून देण्याची गरज आहे. काही प्रकरणात कैद्याला न्यायालयात उभे करण्यासंबंधीची याचिकाही रद्द करण्यात येईल, अशी भीती मला वाटते,’’ असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयानेही देशद्रोहाच्या कायद्याच्या आवश्‍यकतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते, याकडेही बोस यांनी लक्ष वेधले. आपण अनेक वसाहतवादी कायदे नव्या नावाने अद्याप लागू केले आहेत. उदा. बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए). लोकशाही कमजोर होऊ नये यासाठी असे कायदे रद्दबातल करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

कायद्यांच्या गैरवापराची शक्यता

कोणत्याही औपचारिक आणीबाणीपेक्षा या कायद्यांचे पालन करणे हेच आणीबाणीसदृश स्थिती निर्माण करण्यास पुरेसे आहेत. माहिती व तंत्रज्ञानासारखे काही नवे कायदे हे चांगल्या हेतूने तयार केले असले तरी त्याचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक आहे, असेही ते म्हणाले. नेताजींवर अनेक वेळा देशद्रोहाचा आरोप करण्यात आला होता, अशी माहितीही सुगत बोस यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT