मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. संग्रहित छायाचित्र
देश

दिल्लीत आठवडाभराचा कडक लॉकडाउन, सोमवारपर्यंत राजधानी बंद

कोरोनाच्या नव्या लाटेनंतर राज्यातील परिस्थिती बिघडत चालल्याने मुख्यमंत्री केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यात बैठक झाली.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये आता जागा शिल्लक नाही. भविष्यात आरोग्य व्यवस्था कोलमडल्यास मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. त्यापूर्वीच आम्हाला हे मोठे पाऊल उचलावे लागल्याचे असल्याचे ते म्हणाले. नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानंतर सरकारला लॉकडाऊनसारखे पाऊल उचलावे लागणार असल्याची जाणीव झाली, असे केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीवासियांनी लॉकडाऊनचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कोरोनाच्या नव्या लाटेनंतर राज्यातील परिस्थिती बिघडत चालल्याने मुख्यमंत्री केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अनेक उच्चस्तरीय अधिकारीही सहभागी झाले होते. या बैठकीतच पुढील सात दिवसांसाठी 24 तास संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते बैठकीनंतर अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले. ते पुढीलप्रमाणे...

- रात्री 10 पासून पुढील सोमवारच्या पहाटे 5 पर्यंत सहा दिवस दिल्लीत लॉकडाऊन सुरु राहील. यादरम्यान, केवळ अत्यावश्यक सेवार सुरु राहतील. 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभही होईल. लोकांनी लॉकडाऊनचे पालन करावे, घराबाहेर पडू नये.

- प्रति 10 लाख टेस्टच्या हिशोबाने दिल्लीत जगात सर्वाधिक टेस्ट होत आहेत. आम्ही रुग्ण संख्या कमी करुन दाखवली आहे. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाणही कमी करुन दाखवले आहे. आम्ही प्रामाणिकपणे सर्व गोष्टी सांगितल्या.

- तीन-चार दिवसांत 25 हजारांच्या आसपास रुग्ण वाढले. पॉझिटिव्हीटी रेट वाढला आहे. दिल्लीत बेडची कमतरता भासत आहे. आयसीयू बेड जवळपास संपुष्टात आले आहेत. ऑक्सिजनही संपण्याच्या स्थितीत आले आहेत. औषधांची कमतरता भासत आहे. विशेषतः रेमेडिसिविरचा समावेश आहे. हे सर्व आम्ही तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगत नाही. पुढे काय करावे याच्या चर्चेसाठी आम्ही सांगत आहोत.

- सहा दिवसांचा खूप छोटा लॉकडाऊन आहे. कामगारांनी दिल्ली सोडून जाऊ नये, असे आवाहन मी त्यांना करतो. त्यांची पूर्णपणे मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करु, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

दरम्यान, दिल्लीत मागील 24 तासांत 161 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच्या एक दिवस आधी कोविड-19 चे 24375 नवे रुग्ण समोर आले होते. तर 167 जणआंचा मृत्यू झाला होता. दिल्लीत बाधितांची संख्या 8,53,460 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या 12,121 इतकी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग! शनिवारच्या रात्रीत ६ हजार वाहनांचा प्रवास; रविवारी राहणार सर्वाधिक रहदारी

Sangli Ganpati: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! बबलूनंतर आसाममधून येणार नवा हत्ती; गणपती संस्थानचा वैभवशाली थाट कायम राहणार

Marathi News Live Updates : पेपरफुटीला कायमचा आळा घालण्यासाठी झिरो लीक सिस्टीम; परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल, ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार करून ऑनलाइन वितरणाचा प्रस्ताव

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT