सरकारने दिलेला नवा एमएसपीचा फॉर्म्युला शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. त्यामुळे आम्ही तो फेटाळत आहोत, असं शेतकरी नेत्यांनी म्हटलंय. त्यामुळे दिल्ली चलो आंदोलन सुरुच राहणार आहे.
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी यूपीमध्ये काँग्रेसला १७ जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे काँग्रेस तो स्वीकारणार का हे पाहावं लागेल.
एमएसपीच्या मुद्द्यावरुन शेतकरी आणि केंद्र सरकारमधील बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे. हरियाणातील भाजप कार्यालयांसमोर २१ फेब्रुवारी रोजी आंदोलन केले जाणार आहे.
भाजप ४०० पार होऊ म्हणत आहे, पण यावेळी ते संसदेतूनच हद्दपार होतील अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.
अफगाणिस्तानमध्ये नुरुस्तान प्रांतात दरड कोसळल्याने २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
अयोध्येत नुकत्याच झालेल्या श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आदिवासी असल्यामुळे द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात आले नाही. असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
कटकारस्थान करून महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेले असंवैधानिक खोके सरकारच्या काळात सत्ताधारी आमदार, खासदारांची गुंडगिरी वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचा आमदार नितेश राणे राजरोसपणे धमक्या देत आहे. महाराष्ट्र पोलिसांमध्ये नितेश राणेवर कारवाई करण्याची धमक नाही का? असा संतप्त सवाल करून राणेंवर कारवाई करण्याची हिम्मत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
ऑनलाइन डिसइन्फॉर्मेशन, आणि सोशल मिडीयावर चिकिची माहिती बाबत भारत आणि EU मध्ये होणार महत्वाची गोलमेज बैठक होणार आहे.
मी लोकसभेसाठी ईच्छुक नसल्याचे मंत्री नारयण राणे यांनी सांगितले आहे.
भाजपमध्ये निष्ठावंतांवर अन्याय होतोय. मला भाजपकडून कोणतीही ऑफर मिळालेली नाही. त्यामुळे मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र खुद्द जयंत पाटलांनी या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. शिवाय ते पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहे.
MSP आणि इतर मागण्यांसाठी दिल्लीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आता उद्धव ठाकरेही पाठिंबा देण्याची शक्यता आहे. शंभू बॉर्डरवर ठाकरे आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊ शकतात, असंही सूत्रांकडून सांगण्यात येतंय.
राजस्थानमधील काँग्रेस नेते महेंद्रजीत मालवीय यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या (मंगळवार) तीन नव्या IIM चे उद्घाटन होणार आहे. जम्मू, बोधगया आणि विशाखापट्टणम येथे हे नवे IIM सुरू होणार आहेत. यासोबतच ते देशभरात केंद्रीय विद्यालयाच्या 20 नव्या इमारती आणि 13 नव्या नवोदय विद्यालयांचे उद्घाटन देखील करणार आहेत.
राज्य सरकारकडून मराठा समाजाला फक्त झुलवलं जातंय. मराठा समाजाच्या हाती काहीही लागणार नाही. कारण आरक्षणाचा निर्णय हा फक्त केंद्रातूनच होऊ शकतो, असं मत राज ठाकरे यांनी मांडलं.
महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजपमध्ये जाणाऱ असल्याच्या चर्चा होत आहे. मात्र, जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेतील.
Ashish Shelar on Aditya Thackrey: भाजप नेते आशिष शेलारांनी आदित्य ठाकरे यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याचं आव्हान दिलं आहे.
खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात हेमंत गोडसे थोडक्यात बचावले आहेत.
पलपल्ली या ठिकाणी वनविभागाच्या गाडीवर काही लोकांनी हल्ला केला होता. यापैकी दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.
शारदाश्रम शाळेच्या विद्यार्थींचे पालक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. या शाळेतील १२ शिक्षकांपैकी १० शिक्षकांना निवडणूकींची ड्युटी लावली आहे. उरलेल्या २ शिक्षकांपैकी १ शिक्षकांचा अपघात झाला आहे. त्यामुळे ऐन परिक्षेच्या कालावधीत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
Maratha Reservation: माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले की, "सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. सगेसोयऱ्यांसाठी मराठा आमदारांनी आवाज उठवला पाहिजे."
मनसे आणि भाजपमध्ये युती होऊ शकते, अशी शक्यता साम टीव्हीकडून वर्तवण्यात आली आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली होती. यानंतर राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
ड्रग्ज तस्करांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्जसोबत तीन तस्करांना अटक केली आहे. यासोबत ड्रग्ज तस्करांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट देखील उघड झाल्याचा माहिती समोर आली आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरा करण्यात आली. यावेळी नारायणगड संस्थानचे महंत शिवाजी महाराज देखील उपस्थित होते.
पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. पुण्यात सुरू होते रोहिदास जाधव या तरुणावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी रोहिदास ने ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेतलं होतं. दिलेल्या तक्रारीत पोलिस योग्य ती कारवाई करत नसल्याने पोलिसांचे नाव घेत या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
आग्र्याच्या लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी होत आहे. संपूर्ण आग्रा शहरात शिवजयंतीसाठी हजारो बॅनर लावण्यात आले आहेत. मोठा उत्साहया ठिकाणी दिसून येत आहे.
ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर यांनी प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोविडमधून बरे झालेल्या भारतीयांपैकी लक्षणीय प्रमाणात फुफ्फुसाचे कार्य कमी झाले आहे आणि लक्षणे महिने टिकून आहेत. युरोपियन आणि चिनी लोकांपेक्षा भारतीयांच्या फुफ्फुसाचे कार्य अधिक बिघडल्याचे आढळून आले आहे. अभ्यासात म्हटले आहे की, काही लोक एका वर्षात हळूहळू सामान्य स्थितीत परत येऊ शकतात, तर इतरांना आयुष्यभर फुफ्फुसाच्या नुकसानासह जगावे लागेल, असे त्यात म्हटले आहे.
सोलापूरात शॉर्टसर्किटमुळे उसाच्या शेताला आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन एकर ऊस जळून खाक झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील कलहिप्परगी गावात शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली आहे. परमेश्वर मणुरे या शेतकऱ्याचा दोन एकर उस जळून खाक झाला आहे. शासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. तालुक्यात अगोदरच दुष्काळजन्य परिस्थिती आणि अशातच मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
शिवजयंतीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील अनेक मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. उद्या सकाळी ७ वाजल्यापासून शहरातील सर्व मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. शहरातील नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.(Shivjayanti Pune Traffic Changes)
बातमी सविस्तर वाचा- Shivjayanti Pune Traffic Changes: शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; 'हे' महत्त्वाचे रस्ते राहणार बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची शरद पवार यांची मागणी करण्यात आली आहे. याबाबतची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.
शिवजयंती निमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शिवनेरीवर दाखल झाले आङेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.