mamata banarjee 
देश

ममतांचे भाजपला आव्हान, '294 जागांचे स्पप्न बघा पण आधी...'

सकाळ डिजिटल टीम

बोलपूर (पश्चिम बंगाल) - भाजपने पश्चिम बंगालमध्ये आधी ३० जागा जिंकून दाखवाव्यात आणि त्यानंतर २९४ जागांचे स्वप्न पाहावे. भाजप हा बाहेरच्या लोकांचा पक्ष असून नोबेलविजेते साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्या भूमीमध्ये द्वेषाचे राजकारण हे कधीच धर्मनिरपेक्षतेवर विजय मिळवू शकणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. त्या येथे आयोजित रॅलीमध्ये बोलत होत्या.

विश्‍वभारती विद्यापीठाचे कुलगुरू विद्युत चक्रवर्ती हा भाजपचा माणूस असून तो या श्रीमंत वास्तूच्या प्रतिष्ठेला नख लावण्याचे काम करत आहे. विभाजनवादी आणि जातीय राजकारण आता विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आणले जात असल्याची टीका ममता यांनी केली.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
- भाजपचे नेते फाईव्हस्टार हॉटेलात जेवतात
- बंगालमध्ये घुसखोरीसाठी तपाससंस्थांचा वापर
- राज्यामध्ये द्वेषाच्या राजकारणाला खतपाणी
- भाजपकडून मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर
- भाजप आमदार विकत घेऊ शकतो, तृणमूलला नाही
-लोकांनी भाजपकडून पैसे घ्यावेत, मतदान आम्हाला करावे

जे लोक महात्मा गांधी यांचा आदर करू शकत नाही, तेच आता सोनार बांगला तयार करू अशा घोषणा देत आहेत. अनेक दशके आधीच रवींद्रनाथ टागोर यांनी सोनार बांगला तयार केला आहे. आता त्याच बंगालचे संरक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. यासाठी जातीयवादी भाजपला दूर ठेवायला हवे, असेही ममता यांनी नमूद केले. या रॅलीच्या आधी ममतांनी चार किलोमीटरपर्यंत रोड शो देखील केला. यामध्ये मोठ्या संख्येने स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Gas Leak: पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती; २४ नागरिकांना त्रास, मोठा अनर्थ टळला!

Arvind Sawant railway issue : मुंबई-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी, मुंबई-पंढरपूर आणि नांदेड-पुणे रेल्वे सुरू होणार का? खासदार अरविंद सावंत आक्रमक

Navi Mumbai Fraud : नवी मुंबईत एकलहरी बाबा, टणटण बाबाला अटक; दोघांनी मिळून महिलेला फसवलं; अघोरी पूजेच्या नावे...

Newlywed Bride Death : लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूचा अंत, रिसेप्शनहून परतताना अपघात; काका आणि मामाचाही मृत्यू, गाडीचं चाक निखळलं अन्...

लग्नात गायत्री दातारची आई असं काय म्हणाली की नवरा श्रीकांत मंडपातच रडायला लागला? व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT