manmohan singh
manmohan singh 
देश

देशात बेरोजगारी का वाढतेय? मनमोहन सिंग यांनी सांगितलं कारण

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- मोदी सरकारवर निशाणा साधताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी पुन्हा एकदा नोटाबंदीला चुकीचा निर्णय म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, भाजपने विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे देशातील बेरोजगारीचा दर वाढला आहे. शिवाय असंघटित क्षेत्रावर मरणकळा आली आहे. मनमोहन सिंग यांनी असा आरोप केलाय की, मोदी सरकार राज्य सरकारांसोबत नियमितपणे चर्चा करत नाही.    

निवडणुकीचे राज्य केरळमध्ये काँग्रेस पक्षाशी जोडले गेलेले थिंक टँक राजीव गांधी डेव्हलेपमेंट स्टडिजच्या एका व्हर्चुअल संमेलनाचे उद्घाटन करताना मनमोहन सिंह बोलत होते. त्यांनी मोदी सरकार आणि त्यांच्या नीतिवर जोरदार हल्ला केला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून करण्यात येत असलेल्या अनियमित उपायांमुळे क्रेडिट समस्येला झाकलं जाऊ शकत नाही. या संकटामुळे स्मॉल आणि मेडियम सेक्टर प्रभावित होऊ शकते. 

'प्रतीक्षा' नावाने आयोजित केलेल्या संमेलनात माजी पंतप्रधानांनी म्हटलं की, 'बेरोजगारी वाढली आहे आणि असंघटित क्षेत्र नष्ट होत आहे. हे संकट २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झाले आहे'.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचा उद्देश केरळच्या विकासासाठी एक व्हिजन डॉक्युमेंट लॉन्च करण्याचा आहे. 

मनमोहन सिंग म्हणाले की, संघवाद आणि राज्यांसोबत विचारविमर्श हे भारताच्या आर्थिक आणि राजकारणाची आधारशिला आणि संविधानाचे मूळ तत्वे आहेत. पण, सध्याचे सरकार याला महत्त्व देत नाही. केरळच्या विकासासंबंधी बोलताना सिंग म्हणाले की, राज्याचे सामाजिक मापदंड उंच आहेत, पण भविष्यात राज्याला अन्य क्षेत्रावर देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारला अनेक मुद्द्यांवर लक्ष द्यावे लागणार आहे. आरोग्य आणि शिक्षणावर लक्ष दिल्यामुळेच केरळचे लोक देश आणि जगातील सर्व भागात नोकरी करण्यास सक्षम झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT