Manipur Violence 
देश

Manipur Violence: "फाशीच्या शिक्षेवर विचार करू"; मणिपूर घटनेवर CM एन बिरेन सिंह यांचे विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मणिपूर घटनेवर संताप व्यक्त केला

Sandip Kapde

Manipur Violence: मणिपूरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दोन महिलांना विवस्त्र करुन धिंड काढण्यात आली. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी देखील संताप व्यक्त केला. तसेच मणिपूर आणि केंद्र सरकारला फटकारले. दरम्यान मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मोठे विधान केले आहे.  

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले, "हे अत्यंत अपमानास्पद आणि अमानवी कृत्य आहे.  दोन महिलांबद्दल माझ्या संवेदना आहे. काल समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. व्हिडिओ समोर येताच या घटनेची स्वतःहून दखल घेतली. मणिपूर पोलिसांनी आज सकाळी प्रथम कारवाई केली आणि त्यांना अटक केली." (latest marathi news)

"सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि आम्ही हे सुनिश्चित करू की आरोपींना फाशीच्या शिक्षेचा आम्ही विचार करु. आपल्या समाजात अशा घृणास्पद कृत्यांना अजिबात स्थान नाही," असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मणिपूरमधील या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त करत आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, हिंसाग्रस्त भागात महिलांचा वस्तू सारखा वापर केला जात आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई झाली हे सांगितले पाहिजे? पुढील आठवड्यात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT