राजनाथसिंह 
देश

भारत-चीन यांच्यात डोकलाम प्रश्नी लवकरच निघेल तोडगा

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : डोकलाम येथे भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण झालेल्या पेचावर लवकर तोडगा निघेल. चीन याबाबत सकारात्मक पाऊल उचलेल, अशी आशा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली. 

इंडो तिबेटन सीमा पोलिसांच्या (ITBP) वतीने आयोजित एका कार्यक्रमात राजनाथसिंह बोलत होते. 
"मला खात्री आहे की चीन सकारात्मक हालचाली करेल आणि यावर लवकरच तोडगा निघेल. भारताला शांतता हवी आहे असा संदेश आपण शेजारी देशांना देऊ इच्छितो. मात्र, आमच्या भूभागांचे रक्षण करण्याची पूर्ण क्षमता आमच्या सुरक्षा फौजांमध्ये आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. 

जम्मू-काश्मीर ते अरुणाचल प्रदेश या दरम्यान सुमारे 4057 किलोमीटर लांबीच्या भारत-चीन सीमेचे रक्षण ITBP चे सैनिक करतात. भारतीय सैन्याने सिक्कीम येथील डोकलाम भागात चिनी लष्कराला रस्ते बांधण्यापासून रोखल्याने भारत-चीन दरम्यान खडाजंगी सुरू झाली. 'आम्ही आमच्याच हद्दीत रस्ते बांधत होतो,' असा दावा चीनने केला. भारताने आपले सैन्य डोकलाम पठारावरून मागे घ्यावे, असे चीनचे म्हणणे आहे. डोकलाम हा आमचा भूभाग आहे असे भूतानचे म्हणणे आहे, तर चीनसुद्धा त्यावर दावा सांगत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasantha Ramaswamy : माजी शास्त्रज्ञ डॉ. वसंथा रामास्वामी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Navratri 2025: आपण नवरात्र का साजरी करतो? हे आहे आध्यात्मिक महत्त्व आणि कारण

Latest Marathi News Updates Live : साडेतीनशे एकर जागेवरील कांदळवन केले नष्ट

Mumbai Crime: आईचं मुलीच्या प्रियकरावर प्रेम जडले, एकत्र राहण्यासाठी मास्टरप्लॅन आखला, पण नंतर जे घडले त्याने सगळेच हादरले

Arjun Tendulkar : सचिनच्या लेकाने मैदान गाजवले, महाराष्ट्राच्या पाच फलंदाजांना धडाधड तंबूत पाठवले, पहिल्या चेंडूवर विकेट अन्...

SCROLL FOR NEXT