rajnath-singh File Photo
देश

लष्कराच्या वैद्यकीय सुविधा नागरिकांसाठी खुल्या करा; राजनाथ सिंह यांचे निर्देश

कोविडविरोधी लढाईत युद्धपातळीवर काम करण्याचे संरक्षण मंत्र्यांचे सैन्याला आदेश

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील सध्याच्या कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराला मदतीसाठी तयार राहण्याचे तसेच उद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व राज्यांना या काळात आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवण्याच्या सूचनाही त्यांनी लष्कराला केल्या आहेत.

लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्याशी संपर्क साधून राजनाथ सिंह यांनी राज्यांच्या राजधान्यांमध्ये असलेल्या लष्कराच्या कमांडर्सना संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यास सांगितले. तसेच लष्करानं त्यांच्या वैद्यकीय सुविधा नागरिकांसाठी खुल्या करण्याचे आदेश दिले.

संरक्षण सचिव अजयकुमार हे देखील संरक्षण मंत्री आणि लष्करप्रमुखांमधील चर्चेवेळी उपस्थित होते. या चर्चेमध्ये देशभरात कॅन्टोन्मेट बोर्डाकडून चालवल्या जाणारी रुग्णालये छावणी भागात राहणाऱ्या आणि बाहेरुन येणाऱ्या नागरिकांसाठीही खुली करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननं (डीआरडीओ) दिल्लीत आधीच २५० बेडची ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर्ससह सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सुविधा लवकरच ५०० बेडपर्यंत वाढवण्यात येणार आहे. लखनऊमध्ये डीआरडीओ दोन रुग्णालयं उभारणार आहे. ही रुग्णालयं फक्त कोविडच्या रुग्णांसाठीच असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अवकाश विज्ञान तुमच्या दारी! नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ISRO कडून सुवर्णसंधी; ‘युविका 2026’ साठी प्रक्रिया सुरू, कुठे अन कसा अर्ज कराल? वाचा सविस्तर

Farmer Success Story: वाट्याने शेत घेऊन अडीच एकरांत १२ लाखांचे खरबुजाचे उत्पादन; वांगीतील चौधरी भावंडांनी घेतले ५० टन फळ; व्यवस्थापनातून अडचणींवर मात!

IND vs SA : 'गौतम, सूर्या यांच्या दोन चुकांमुळे भारतीय संघ हरला'; द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर R Ashwin चांगलाच संतापला

Shaktipeeth Highway: शक्तिपीठसाठी जबरदस्तीने मोजणीचे राज्यभर पडसाद; परभणीतील महिला शेतकऱ्यांना मारहाण, बाधित शेतकरी संतप्त!

'तुझं नशीबच खूप चांगलं आहे गं' म्हणणाऱ्या बायकांना तेजश्री प्रधानने सुनावलं; म्हणाली, 'मी रात्रभर रडले...'

SCROLL FOR NEXT