swami vivekanand  
देश

National Youth Day: राष्ट्रीय युवा दिवसाचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या इतिहास

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते. 1984 साली भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला. त्यानंतर 1985 पासून दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जाऊ लागला. स्वामी विकेकानंद याचे जीवन आणि त्यांच्या विचारांमधून तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला होता.  

दुसरा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव; PM मोदी राहणार उपस्थित

या दिवशी देशभरातील शाळा आणि कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी योगासनाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. याशिवाय पूजा-पाठ, व्याख्याने आणि विविकानंद यांच्यावरील साहित्य प्रदर्शनासाठी ठेवले जाते. 

तरुणांमध्ये लोकप्रिय होते विवेकानंद

स्वामी विवेकांनंद यांचे नाव अशा विद्वानांमध्ये घेतले जाते, ज्यांनी मानवतेची सेवा हाच खरा धर्म मानला होता. संन्यासी स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये बंगालमध्ये झाला होता. स्वामी विवेकानंद आपल्या आवेशपूर्ण आणि तर्कावर आधारित भाषणांमुळे लोकप्रिय झाले. विशेष करुन त्यांची भाषणे आणि विचार तरुणांना भावले. 

मानवतेच्या सेवेसाठी विवेकानंदानी 1887 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. या मिशनचे नाव विवेकानंदानी आपले गुरु रामकृष्ण परमहंस याच्या नावावरुन ठेवले होते. भारतीय तरुणांसाठी स्वामी विवेकांनद यांच्यापेक्षा दुसरा मोठा आदर्श नेता क्वचितच असेल. त्यांनी अमेरिकेतील शिकागोमध्ये 1893 मध्ये आयोजित विश्व धर्म महासभेत भारत आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होते. 

चिकन विक्रेत्यांना आता मास्क अन्‌ ग्लोज बंधनकारक ! पीपीई कीट घालून मृत पक्षांची...

स्वामी विवेकानंद यांचा जीवन परिचय सांगून जातो की, 39 वर्षाचा त्यांचा अल्प जीवनकाळात त्यांनी जे केलं त्यामुळे भविष्यातील पिढ्यांना ते मार्गदर्शन करत राहतील. 25 व्या वर्षी त्यांनी भगवे कपडे धारण करत संन्यास घेतला होता. पायी चालून त्यांनी संपूर्ण भारतभ्रमण केलं होतं. त्यांनी अनेक देशांनाही भेट दिली होती.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरंन्सिगच्या माध्यमातून दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात (National Youth Parliament Festival - NYPF)उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान महोत्सवाचे तीन राष्ट्रीय विजेते देखील आपले विचार मांडणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT