देश

'ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचाराला अमित शहाच जबाबदार; गृहमंत्र्यांना बडतर्फ करा'

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - प्रजासत्ताकदिनी शेतकरी संघटनांच्या ट्रॅक्टर मोर्चाच्या नावाखाली उपद्रवी घटकांनी केलेल्या हिंसाचारासाठी केंद्र सरकारचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा आक्रमक हल्ला काँग्रेसने चढविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्काळ अमित शहा यांना बडतर्फ करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. लाल किल्ल्यामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये नाव येत असलेल्या दीप सिद्धूची ‘मोदी-शहा यांचा चेला’ अशी संभावना करताना हा संपूर्ण प्रकार शेतकरी आंदोलन कारस्थानाने दडपण्याचा प्रकार असल्याचाही आरोप केला आहे. 

काँग्रेसचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीतील हिंसाचारावर केंद्र सरकारला आणि प्रामुख्याने गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले. 

‘आक्रमक झुंड लाल किल्ल्यामध्ये शिरत असताना दिल्ली पोलिस हातावर हात ठेवून बसले होते. या घटनाक्रमात मोदी-शहा यांचा चेला दीप सिद्धूची हजेरी आश्चर्य आहे. सरकार बळाचा वापर करून शेतकरी आंदोलन दडपू शकले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना हटविण्यासाठी आता कारस्थान केले जात आहे,’ असा आरोप सुरजेवाला यांनी केला. दिल्लीतील हिंसाचार आणि धुडगूस रोखण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची नव्हे तर सरकारची आहे, असा इशारा देताना देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तसेच सर्वोच्च सुरक्षा असलेल्या लाल किल्ल्यामध्ये ४० ते ५० ट्रॅक्टर आणि धुडगूस घालणारे उपद्रवी मंडळी कसे शिरू शकतात, दीप सिद्धू या सर्वांचे नेतृत्व करत होता. सिद्धू आणि त्याच्या समर्थकांना लाल किल्ल्यापर्यंत जाण्याची परवानगी कोणी दिली, पोलिस खुर्च्यांवर बसून तमाशा पाहत होते, अशी प्रश्नांची फैर सुरजेवाला यांनी झाडली. 

दिल्लीतील हिंसाचार शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रकार असल्याचे सूरजेवाला यांनी सूचक शब्दात सांगितले. ते म्हणाले की कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांच्या आंदोलनामध्ये आतापर्यंत 178 शेतकऱ्यांनी प्राण गमावले आहेत. या शेतकऱ्यांना हिंसाचारच करायचा असता तर मागील 63 दिवसांपासून ते लाखोंच्या संख्येने हाडे गोठविणाऱ्या थंडीमध्ये दिल्लीच्या सीमेवर रस्त्यात कशाला बसले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

SCROLL FOR NEXT