कामगार कायदा कामगार कायदा
देश

नवीन कामगार कायदा लागू झाल्यास पगार आणि पीएफमध्ये होईल बदल

कामाचे तास, हातातील पगार आणि साप्ताहिक रजेवर पुढील आर्थिक वर्षापासून परिणाम होऊ शकतो

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही कर्मचारी असाल तर कामाचे तास, हातातील पगार आणि साप्ताहिक रजेवर पुढील आर्थिक वर्षापासून परिणाम होऊ शकतो. कारण, भारतात वेतन कामगार कायदे, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यावसायिक सुरक्षा कायदे हे चार नवीन कायदे (New Labor Act) लागू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हे कायदे पुढील आर्थिक वर्ष २०२२ मध्ये लागू केले जाऊ शकतात. या कायद्यांच्या अंमलबजावणीनंतर अनेक बदल पाहायला मिळतात.

केंद्र सरकारने (Central Government) यापूर्वीच चार नवीन कामगार कायद्यांना (New Labor Act) अंतिम रूप दिले आहे. आता याबाबत राज्यांकडून नियमांची प्रतीक्षा आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले, कामगार हा समवर्ती विषय असल्याने तो सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी लागू व्हावा, अशी सरकारची इच्छा आहे. सुमारे १३ राज्यांनी व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीवर श्रम संहिता नियमांचा मसुदा तयार केला आहे.

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी वेतनावरील कामगार संहितेचा मसुदा तयार केला आहे. त्याचवेळी २० राज्यांनी औद्योगिक संबंध संहितेच्या नियमांचा मसुदा तयार केला आहे. १८ राज्यांनी सामाजिक सुरक्षा संहितेचा मसुदा नियम तयार केला आहे.

चार दिवस काम १२ तास

नवीन कामगार कायदा लागू झाल्यास पुढील आर्थिक वर्षापासून कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवसांऐवजी केवळ चार दिवस (Working hours) काम करावे लागणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना दिवसाला १२ तास काम करावे लागणार आहे. नवीन कायदा लागू झाल्यानंतर आठवड्यातून ४८ तास काम करण्याची तरतूद कायम राहणार असल्याचे कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

मूळ वेतन, पीएफच्या गणनेत होणार मोठे बदल

नवीन कामगार कायदा लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा घरपोच पगारही कमी (Salary) होणार आहे. मात्र, पीएफमधील योगदान वाढेल. नव्या लेबर कोडमध्ये भत्ते ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आले आहेत. यामुळे मूळ वेतन कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराच्या ५० टक्के होईल. एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार ५० हजार असेल तर त्याचे मूळ वेतन २५,००० असू शकते. उर्वरित २५,००० भत्त्यांमध्ये जातील. अशा स्थितीत मूळ पगार वाढला तर पीएफ (PF) जास्त कापला जाईल आणि हातात येणारा पगार कमी होईल. तसेच नियोक्ता किंवा कंपनीचे योगदान वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पवन हंस हेलिकॉप्टर ७ जणांसह समुद्रात कोसळलं, हेलिपॅड फक्त ३०० मीटरवर होतं; काय घडलं?

British Airways Boeing 787 Emergency Landing in Nagpur : लंडनहून निघालेलं विमान अचानक नागपुरात! 169 प्रवाशांचा जीव टांगणीला; पहाटे 5:30 वाजता नेमकं काय घडलं?

Share Market fraud: जादा नफ्याच्या आमिषाने घातला ४३ लाखांना गंडा; शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा; आयपीओमधून ऑनलाइन फसवणूक!

२ महिन्यांपूर्वी संपली मालिका! पुन्हा येतेय गिरीजा आणि मंदारची जोडी; अभिनेत्याने स्वतः दिली गुड न्यूज

Latest Marathi News Live Update : राजूर ते अहिल्यानगर १४८ किमी पायी लाँगमार्चला सुरुवात; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ‘लाल वादळ’ मार्गस्थ

SCROLL FOR NEXT