news delhi nirbhaya case president rejected mercy petition pawankumar gupta 
देश

निर्भया खटला : दोषींना फाशीचा मार्ग मोकळा; कायद्यातील पळवाटा संपल्या? 

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली News Delhi Nirbhaya Case : कायद्यातील पळवाटांमुळं सातत्यानं लांबणीवर पडल्यानंतर आता निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याप्रकरणातील अक्षय ठाकूर, पवनकुमार गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह यांना न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण, सतत्याने दया याचिका दाखल करून हे चौघेही फाशी टाळण्याचा प्रयत्न करत होते. पण, आता त्यांना फाशी देण्याच्या निर्णयातील सर्व अडथळे दूर झाले असून, कायद्यातील पळवाट संपल्या असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता नव्याने या चौघांना फासावर लटकवण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपतींचा महत्त्वाचा निर्णय 
निर्भया प्रकरणातील चारही दोषींना 3 मार्च रोजी सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार होती. परंतु, आरोपी पवनकुमार गुप्ताने पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात, क्युरेटिव्ह याचिका दाखल केली. कोर्टाने ती फेटाळल्यानंतर त्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली. या याचिकेवरील निर्णय न झाल्यानं पटियाला हाऊस कोर्टाने 2 मार्च रोजी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. आज, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पवनकुमार गुप्ताच्या याचिकेवर निर्णय दिला. त्यांनी पवनकुमारची दया याचिका फेटाळून लावली. त्यामुळं चारही आरोपींचे कायद्याने फाशी टाळण्याचे मार्ग संपले आहेत. त्यामुळं पुन्हा या चौघांना फासावर लटकवण्यासाठी नव्याने डेथ वॉरंट काढले जाण्याची शक्यता आहे. 

तीन वेळा फाशीला स्थगिती
निर्भया प्रकरणातील चारही दोषींना तीन वेळा फाशी देण्याचे आदेश दिले होते. पण, तिन्ही वेळा त्याला स्थगिती देण्यात आली. पहिल्यांदा 7 जानेवारीला फाशीच्या अंमलबजावणीचे आदेश दिले होते. त्यावेळी 22 फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार होती. त्यावर कारवाईच्या आधीच 17  जानेवारील एक नव्याने फाशीच्या अंमलजावणीचे आदेश देण्यात आले होते. त्यालाही 1 फेब्रुवारीला रोखण्यात आले.  त्यावेळी पवनकुमार आणि अक्षय ठाकूर यांच्याकडे कायदेशीर पर्याय शिल्लक होते. त्यानंतर पुन्हा 17 फेब्रुवारीला एक डेथ वॉरंट जारी करण्यात आले त्याला 2 फेब्रुवारीला स्थगिती देण्यात आली. कारण, पवनकुमारच्या याचिकेवर राष्ट्रपतींनी कोणताही निर्णय दिलेला नव्हता. 

महत्त्वाचा घटनाक्रम 

  • 16 डिसेंबर 2012 रोजी पॅरामेडिकल स्टुडंट असलेल्या तरुणीवर दिल्लीत धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार. तिच्या मित्राला जखमी करून निर्भयासह गाडीतून बाहेर फेकून देण्यात आले होते. 
  • 17 डिसेंबर 2012 देशभरात घटनेचे पडसाद आणि दोषींवर कायदेशीर करा
  • 18 डिसेंबर 20132 मुख्य आरोपी बस ड्रायव्हर राम सिंहसह चारही आरोपींना अटक 
  • 11 मार्च 2013 रोजी मुख्य आरोपी राम सिंहची तिहार कारागृहात आत्महत्या 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT